अॅड. प्रज्ञेश चैतन्य यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 December 2019

अॅड. प्रज्ञेश चैतन्य यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार


अॅड. प्रज्ञेश चैतन्य यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार

ठाणे : येथील अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांना "भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार २०१९"  बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात बहरिन राष्ट्रातील जागतिक मानवी अधिकार या संघटनेचे अध्यक्ष लीलाधर बायकम्पडी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
     
        वर्ल्ड ह्यूमन राईट पिपल्स कौन्सिल यासंस्थेच्या वतीने देश विदेशातील, विविध क्षेत्रातील मानवी मूलभूत हक्कांसाठी, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी ठाणे शहरातील अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांच्या एकूणच कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

       अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे हे ठाणे शहराचे मूळ रहिवासी आहेत.विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य ते करीत आले आहेत. त्याचबरोबर समाजसेवेतून मानवी मूलभूत हक्कांसाठी सदैव लढा देण्यासाठी ते अग्रेसर असतात आणि तेव्हापासून ते २० वर्ष अविरहितपणे विविध विषयांवर वर्तमानपत्रात लिखाण करीत आहेत. आतापर्यत त्यांचा सामाजिक व इतर विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रचार प्रसार करून भारतीय संविधान हाच देशाचा सर्वोच ग्रंथ मानून, प्रत्येक भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी अॅड. सोनावणे मानवाच्या हितासाठी कार्य करीत आहेत.

        ते आदिवासी ग्रामीण भागात जाऊन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शाळेची सामुग्री भेट देत असतात. तसेच त्यांनी विधी क्षेत्रामध्ये हजारों गरीब पिढीत लोकांना आतापर्यंत मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केलेले आहे. विविध साहित्य, कवी संमेलनातून आणि सामाजिक कार्यक्रमातून ते आपल्या कविता, लिखाणाच्या माध्यमातून मानवी हक्कांच्या हितासाठी समाजप्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे उत्तम कवी, लेखक, वकील, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते.

        त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल ज्येष्ठ हिंदी मराठी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे, विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड, गज़लकार निला वाघमारे, मनीषा मेश्राम, कवी किरण सोनावणे, युवा कवी मिलिंद जाधव, नागराज बोरसे, प्रभाकर शिंदे, राहुल भोजने, युवराज बागुल, योगेश जाधव, सागर कांबळे, रामचंद्र पवार, मारुती कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages