औरंगाबाद : जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता यावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याने प्रशासनाला टप्याटप्याने पण काही कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुरूवातीला रात्रीची संचारबंदी, त्यानंतर अंशत: लॉकडाऊन आणि आता संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
रूग्ण दाखल करण्यासाठीच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन करत लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या बाधीतांना सीसीसीमध्ये उपचार उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून अधिक त्रास आणि उपचारांची गरज असलेल्या रूग्णांसाठी खाटा उपलब्ध राहणार आहेत. जिल्हयातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन काळजीपुर्वक काम करत आहे.
जिल्ह्यात आणि विशेषत: शहरात हॉट स्पॉट वाढत असल्याने नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णण घ्यावा लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणेला आपली क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बेडची संख्या वाढविण्यात प्रशासनाचा भर आहे.
जिल्ह्यात ताप, सारी रुग्णांचा सर्व्हे करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रबोधन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
अंशत: लॉकडाऊनच्या काळात शहरात आणि ग्रामीण भागातही नियम मोडणाऱ्यांवर अनेक ठिकाणी कारवाई केली. तसेच मास्कचे वाटप देखील मोठ्या प्रमाणात केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात गरजुंना शिवभोजनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यासाठी केंद्राची संख्या वाढविणार असून या कार्यात एनजीओंची देखील मदत घेतली जाणार आहे.
सदरील बैठकीस खासदार इम्तियाज जलील, जिल्हा परीषद अध्यक्षा मिनाताई शेळके, आमदार सतीष चव्हाण, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाट, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, यांच्यासह अन्न औषध प्रशासन, आरोग्य, महसूल, नगरपालिका, पोलीस, कृषी, सहकार यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment