किनवट ,२२ : क्रांतीसूर्य प्रतिष्ठान आयोजित आश्विन पौर्णिमे निमित्त तक्षशिला बुद्ध विहार, विद्यानगर, गोकुंदा(ता. किनवट) येथे काव्य पौर्णिमा नुकतीच साजरी करण्यात आली. सांगावाकार महेंद्र नरवाडे हे अध्यक्षस्थानी होते.
कवी संमेलनात काव्य पौर्णिमेनिमित्त स्थानिक कवींनी बहारदार रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांच्या वंदनेने कवी संमेलनाला सुरूवात झाली. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदन गीत सादर केले.
त्यांनंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी ठेवावे शुद्ध आचरण हेच बुद्धाचे सांगणे, कवयित्री वंदना तामगाडगे यांनी समाजाचा गाडा आता नेकीने रेटा नीट, संगीत शिक्षिका आम्रपाली वाठोरे यांनी आमृतवानी ही बुद्धाची ऐका देऊनी ध्यान, प्रा.एस.डी.वाठोरे यांनी सुरू झाली सतयुगाची नांदी, युवाकवी राजेश पाटील यांनी धम्म हा नवा दिला तु भीवा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रद्धास्थान आपलं, अनिल उमरे यांनी राहो सुखाने हा मानव इथे, प्रा.सुभाष गडलिंग यांनी दु:ख गामी वळनावर , गायिका मंगला कावळे यांनी सुशिला,पंचशिला चला चला ग विहाराला, क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी ऊर्जास्रोत बाबासाहेब, सिमा नरवाडे यांनी आपण मस्तपैकी आनंदाच्या बीया पेरीत जावे.. अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करुन काव्य रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.
कवीसमेलनाचे अध्यक्ष कवी महेंद्र नरवाडे यांनी हजारो वर्षाच्या वळवंटी तुझ्या भावनेला
येऊदे आता धम्मपथावर अन मिळूदे बुद्धप्रकाश ! अशा बहारदार रचनेने कवीसमेलनाचा समारोप केला. कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले, तर प्रा.डा.पंजाब शेरे यांनी आभार मानले. यावेळी काव्य रसिक सखाराम घुले, पत्रकार विशाल गीमेकर, संघपाल कौठेकर, सतीश विणकरे, संघमित्रा वाघमारे, सुजाता नरवाडे, करुणा परेकार, अनिता बनसोड , ललिता कयापाक , भाग्यरथा राऊत,राधाबाई दुथडे ,अक्षरा गोखले,प्रज्योत कांबळे यांच्या सह अनेक काव्यरसिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment