औरंगाबाद, दि. 22 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 193 जणांना (मनपा 135, ग्रामीण 58 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 6690 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 359 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12025 झाली आहे. आजपर्यंत एकूण 414 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4921 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 256 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 24, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 125 आणि ग्रामीण भागात 106 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण (107)
समता नगर, सिल्लोड (1), औरंगाबाद (13), फुलंब्री (3), गंगापूर (24), खुलताबाद (1), वैजापूर (56), पैठण (9)
सिटी एंट्री पॉइंट (24)
पैठण (1), गारखेडा (1), चित्तेगाव (4), अजिंठा (1), समृद्धी महामार्ग कर्मचारी (1)
रामचंद्र नगर (1), वाळूज (2), बजाज नगर (4), रांजणगाव (2), वडगाव (1), उस्मानपुरा (1)
शिवाजी नगर (2), अन्य (3)
तीन कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत उमाजी कॉलनीतील 65 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात बालाजी नगरातील 72 आणि जुना बाजार येथील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment