किनवट,दि.१० : तालुक्यातील सात मंडळापैकी बोधडी व जलधरा या दोन मंडळात गुरुवारी (दि.९) अतिवृष्टी झाली,तर उर्वरित पाच मंडळामध्ये हलका,मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला शुक्रवारी (दि.१०) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकूण ३१० मि.मी.,तर सरासरीत ४४.२९ मी.मी.पाऊस झाला.
तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये)
किनवट- २२(२२८)मि.मी;ईस्लापूर- ३७(२५९)मि.मी.;मांडवी - ३६
(१८७)मि.मी.;बोधडी- ६७(२३४)मि.मी; दहेली-४०(३६६)मि.मी.;जलधरा- ७३(२२२)मि.मी.;शिवणी- २५(२७८)मि.मी.तालुक्यात आज ४४.२९,तर आजपर्यंत २५३.५७ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस दहेली मंडळात झाला आहे.सध्या तालुक्यातील नदि नाले वहाते झाले आहेत. बहुसंख्य शेतक-यांनी पिकांच्या आंतरमशागती सुरु कल्याआहेत. काल झालेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. तालुक्याला अजुनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
No comments:
Post a Comment