नवी दिल्ली, २३ :भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे योगदान देणारेशहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमातयावेळीअपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त श्यामलाल गोयल यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगीसहायक निवासीआयुक्त डॉ राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment