किनवट,दि.६ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतीशिल अभिवादन करण्यासाठी व २६/११ च्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, वीर-जवानांना रक्तदान करून अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी(दि.६) सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे
आयोजन करण्यात आले.यात दुपारी दोन वाजेपर्यंत ६८ च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा आकडा ७५ त्यावर पोहचेल अशी माहिती माहिती युवा पॅंथर संघटनेचे अध्यक्ष अॅड.सम्राट सर्पे व सचिव निखिल कावळे यांनी दिली.शिबिराचे हे ७ वे वर्षे आहे.
शिबिराचे आयोजन युवा नेते राहुल सर्पे यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी १० च्या सुमारास अनेक मान्यवरांच्या हस्ते डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिकरित्या वंदना घेतली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके,दादाराव कयापाक,पीरिपा चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, प्राचार्या शुभांगीताई ठमके,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे, गंगुबाई परेकार,सुजाता कोल्हे,दशरथ पवार,प्रा.रविकांत सर्पे, क्रांती शरण केराम, बाळकृष्ण कदम,अॅड.सुनिल येरेकार,गोकुळ भवरे,राजेश पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, आनंदरश्मी कयापाक ,रवि कांबळे,सम्यक सर्पे,विनोद कदम,प्रा.डाॅ.आनंद भालेराव,फसीभाई ,विवेक ओंकार, भीमराव पाटील,विनोद कदम यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment