मुंबई :
राज्यातील हवामानसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशातच आता 3 व 4 डिसेंबरदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
त्यामुळे आता मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट :
सिंधूदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment