किनवट,दि.१८ : अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज(दि.१८) दुपारी कलावती गार्डन (स्मृतीशेष प्रदिप नाईक) नगरीत संपन्न झालेल्या १९ व्या सामुहिक बौद्ध विवाह मेळाव्यात २२ जोडपी विवाहबद्ध झाले.विवाह विधी वामनदादा कर्डक संगीत विद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी पार पाडला.
याप्रसंगी वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख जोतिबा खराटे, आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, बेबीताई नाईक,ॲड.राहुल नाईक, सामुहिक बौद्ध विवाह मेळाव्याचे प्रवर्तक ॲड.सुभाष ताजने,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,व्यंकटराव नेम्मानिवार,अभय महाजन, पत्रकार प्रमोद पोहरकर, फुलाजी गरड, किरण ठाकरे,संजय सिडाम यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,माजी नगरसेविका करुणा आळणे, अजिंक्य आळणे, ॲड.आकांक्षा आळणे, अतुल बनसोड, प्रविण गायकवाड,दिनेश कांबळे,विजय पोलासवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment