विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. असे आयु. मिलिंद माचले यांचे प्रतिपादन ; स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे आयोजित दिवशीय संस्कार शिबीराची सांगता
पुणे :
दि ०२/०५/२०२५ ते १२ /०५/२०२५ रोजी स्वयंदीप सोशल फाउंडेशन , पुणे यांच्या माध्यमातून ओळख महामानवाची यामध्ये १० दिवशीय संस्कार शिबीर घेण्यात आले . या समारंभाची सांगता दि १४/०५/२०२५ रोजी आयोजीत करण्यात आले होते . यावेळी स्वयंदीप सोशल फांउडेशनच्या संचालिका सौ. प्रतिभा वानखेडे यांनी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ मोबाईल , टीव्ही सीरियल मध्ये गुंतून न राहता ,त्यांनी एकत्र यावे, सामाजिक , बौद्धिक , वैचारिक दृष्ट्या त्यांचा विकास व्हावा , संघ भावना वाढवी या उद्देशाने उन्हाळी संस्कार शिबिर आयोजित केले होते. विहार कमिटीने उस्फुर्त प्रतिसाद दिला त्यामुळे पाचही उन्हाळी शिबीर सफल झालीत असे त्यांनी यावेळी सांगितले.
दिनांक १४ मे २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे दहा दिवसीय उन्हाळी संस्कार शिबिराचा सांगता समारोप समारंभ पार पडला. शिबिराचे आयोजन स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्यावतीने करण्यात आले होते. या शिबिरात १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सामाजिक , शैक्षणिक ,बौद्धिक ,भावनिक दृष्ट्या विकसित करण्यासाठी विविध खेळ तसेच दहा दिवस दहा महापुरुषांच्या महान कार्याची माहिती देण्यात आली. शिबिराच्या समारोप समारंभात बोलतांना कार्यक्रमाचे बुद्ध, फुले , शाहू आंबेडकर विचारधारेचे प्रशिक्षक मा. मिलिंद माचले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना , बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देत बाबासाहेबांच्या गुणांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने ज्ञान आत्मसात करणे आजच्या युगात गरजेचे आहे.
कार्यक्रमाला आंबेडकरी विचारधारेचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतदादा साळवे तसेच डॉ पंचशीला दुर्गे , अनिलकुमार बस्ते यांनी मार्गदर्शन केले. शिबिराविषय विद्यार्थ्यांनी , शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचक फाल्गुनी सोनवणे, प्रास्ताविक साक्षी कांबळे तर सुनंदाताई गायकवाड यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरिता सोनवणे , नंदा उबाळे , सागर मिसाळ , संघप्रिया सोनकांबळे, रमा बनसोडे , सुनंदाताई निकाळजे, पूजा पोळ, राधा वाघमारे , गौतमी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment