नांदेड :
आंबेडकरवादी विचारांच्या परिवर्तनीय तत्व प्रणाली हीच देशाला तारू शकते त्यामुळे परिवर्तनाच्या ह्या विचारधारेस केंद्र बिंदू मानून बहुजनाना जोडण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले या प्रसंगी भंते पाण्यबोधी,कुणाल कांबळे,डॉ यशवंत चव्हाण,उत्तम सोनकांबळे,शिवाजी सोनकांबळे,एड शिवराज कोळीकर,दैवशील गवंदे,डॉ भास्कर दवणे,मधुकर गच्चे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबेडकरवादी मिशन हे वैचारिक विचारांची देवाण घेवाणीचे महत्त्वाचे केंद्र आहे असे डॉ यशवंत चव्हाण यांनी स्पष्ट केले .
सामाजिक जीवनात कार्य करताना स्वतःच स्वार्थ बाजूला ठेऊन तत्व ला प्राधान्य देणे काळाची गरज आहे असे दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment