किनवट :
१२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत गोकुंदा येथील मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीदेखील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.कला व विज्ञान शाखेचा मिळून ९१.६१. टक्के निकाल लागला असून यावर्षी गुणवत्तेत मुलींनी बाजी मारली आहे.
महाविद्यालयाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेतुन एकुण ९८ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते. पैकी ९७ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून ९८.९८ टक्के निकाल लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) ३९,(७५%पेक्षा जास्त) ०४ एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.फाळके तनुश्री शामराव -८४.६७% ही प्रथम,कु.पठाण शरेफारमीन महेमुद खान ८१..६७ % ही व्दितीय तर कु. हुलकाने दुर्गा प्रकाश हीने ७६.००% गुण घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला शाखेतुन एकुण ४५ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते पैकी ३४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. ७५.५६% टक्के निकाल हा कला शाखेचा लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) ०३ ,(७५%पेक्षा जास्त) ०१ , एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले.
कला शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.दहिफळे वैशाली मारोती -७७.१७% ही प्रथम,कु.राठोड काजल वसंतराव ६८.१७% ही व्दितीय तर जाधव सोनाली दिपक हिने ६४.००% गुण घेवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.विज्ञान शाखेतुन उद्यानविद्या शास्त्र या विषयात सलगरकर सक्षम हनमंतराव याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहे.
विज्ञान शाखेचा ९८.९८% तर कला शाखेचा ७५.५६ % असा एकूण ९१.६१ टक्के निकाल लागला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके, सचिव शुभांगीताई ठमके, प्राचार्या स्वाती बनसोड व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment