छ. संभाजीनगर दि.२६ : राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण आणि आरक्षण या दोन माध्यमांतून वंचित व दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. त्यांनी राबवलेली धोरणे केवळ त्यांच्या काळापुरती मर्यादित राहिली नाहीत, तर भारतीय संविधानातील मूलभूत तत्त्वांच्या रुपात आणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी छ. शाहूंचा खऱ्या अर्थाने गौरव केला असे प्रतिपादन डॉ.सुनील वाकेकर यांनी छ शाहू महाराज जयंती निमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने मिलकॉर्नर येथे अभिवादन करताना केले.
पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या काळात आरक्षणाचे मूलभूत तत्व धूसर करण्याचे प्रयत्न, आरक्षणाचे वर्गीकरण, स्पर्धा आणि गुणवत्तेच्या चुकीच्या व्याख्या वापरून सामाजिक न्यायावर आघात केला जात असून अशा वेळी शाहू महाराजांचा स्पष्ट, कार्यकारण भाव मांडणारा दृष्टिकोन समजून घेणे हेच खरे अभिवादन असून सरकार या धोरणांची पायमल्ली करत असल्याची टीका केली.
यावेळी चंद्रकांत रुपेकर, काकासाहेब गायकवाड, प्रा.सिद्धोधन मोरे, सचिन निकम, संदिप गायकवाड, मनीषा साळुंखे, विकास हिवराळे, असजद खान, अनिल हिवराळे, रामराव नरवडे, विनोद वाकोडे, बालाजी सोनवणे, तुषार अवचार, सतीश शिंदे,कुणाल भालेराव आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment