दुर्लक्षित क्रांतिकारक उमाजी नाईक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 February 2020

दुर्लक्षित क्रांतिकारक उमाजी नाईक



उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. भारतातील ब्रिटिशविरुद्धच्या १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले होते पण त्यांची नोंद इतिहासकारांनी म्हणावी तशी घेतली नाही . अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा आणि सर्व प्रथम ब्रिटिशांना देशाबाहेर घळवण्यासाचं स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर म्हणजे 'उमाजी नाईक' होतं .
उमाजी नाईक हे रामोशी-बेरड समाजाशिवाय इतरांनी त्याच्याकडं दुर्लक्षच केल्याचं जाणवत . त्यामुळे, उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहिल्याचं दिसतं .
क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच नागरिकांनी केले पाहिजे , असं आपण म्हणतो पण जातीपाती मानसिकतेमुळंमग उपेक्षित घटकातील हउमाजी नाईक यांच्या सारख्या देशभक्ताची उपेक्षाही करतो असं असही म्हणण्याची वेळ येते . खरं पहिलं तर " मरावे परि क्रांतिरूपे उरावे " ही उक्ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांना तंतोतंत लागू पडते . ते स्वत:च्या कार्या - कर्तृत्ववान ते स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकाराकांसाठी दीपस्तंभ ठरले आहेत .त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट यांनी १८२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे . जनता त्यांना मदत करत आहे . कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार तर करणार नाही ना ?"
तर दुसरा ब्रिटिश अधिकारी टॉस म्हणतात , " उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून ती उमाजी नाईकांच्या कर्तृत्वाची पावती आहे . इंग्रजांनी कपट करस्थांन आखून देश दीर्घकाळ आपल्या ताब्यात कसा राहील याची रणनीती आखली नसती तर कदाचित स्वातंत्र्याचा सूर्य तेव्हाच भारतात उगवला आसता .
आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीच्या कुटुंबियांकडॆ पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती . त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचेपुरे आणि करारी होते . त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली होती . उमाजी जसे जसे मोठे होत गेले तसे त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. याच काळात इंग्रजांनी भारतावर आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी १८१८ मध्ये पुणे ताब्यात घेतले . त्यानंतर ब्रिटिशांनी सर्वप्रथम इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचं काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिलं . त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली . त्यातच इंग्रजांचे जनतेवरील अत्याचार वाढू लागले . त्यामुळं करारी उमाजी नाईक अस्वस्थ होतं होते . छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन स्वराज्याचा पुकार करत देशावरील परकीयांची सत्ता खपवून घेणार नसल्याचं जाहीर केलं . विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाचा भंडारा उधळत इंग्रजांच्या विरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार , अन्याय झाल्यास ते भावासारखे मदतीस धावून जाऊ लागले . त्यामुळं इंग्रजांना राज्य चालवणं कठीण जाऊ लागलं . लोक न्यायासाठी उमाजी नाईक यांनी मदत घेऊ लागले . त्यातचं इंग्रजांविरुद्ध मानस तयार होऊ लागलं इंग्रजांना हे सहन झालं त्यामुळं उमाजी नाईक यांना ब्रिटिशांनी १८१८ मध्ये अटक करून एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. तुरुंगातील शिक्षे दरम्यान त्यांनी लिहिणे - वाचणेअवगत केले . तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते शांत बसले नाहीत .तर त्यांनी पुन्हा इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी नाईक देशासाठी लढत होते त्यामुळं जनताही त्यांना साथ देऊ लागली . परिणामी इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस यांनी सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजी नाईक यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झालं त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . उमाजी नाईक यांनी पाच ब्रिटिश सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली होती असं सांगितलं जातं . त्यामुळं ब्रिटिश चांगलेच धास्तावले होते . उमाजी यांचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ पाच हजार सैनिक होते.
उमाजी नाईक यांनी १८२४ मध्ये भाबुड्री येथील ब्रिटिशांचा खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ रोजी उमाजी नाईक यांनी ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीच्या डोंगर रंगात उठतील आणि तुमचे जगणे मुश्किल करतील . फक्त इशारा देऊन न थांबता त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० रोजी उमाजी नाईक यांनी आपला पाठलाग करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफनीच्या साह्यानं घायाळ करून पिटाळून लावलं होतं . आणि काही सैनिकांचे प्राणही घेतले होते.
उमाजी नाईक यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी ब्रिटिश सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात " लोकांनी ब्रिटिश नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि ब्रिटींशाविरुद्ध अराजकता माजवावी. त्यांचे खजिने लुटावेत. ब्रिटिशांना शेतसारा,पट्टी देऊ नये. ब्रिटिशांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास ते भारत सोडून जातील आणि आपले नवीन सरकार शासन आपण आणू शकू " असे आवाहनही उमाजी नाईक यांनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजा बनले . या सर्व प्रकारामुळे ब्रिटिश गडबडले आणि त्यांनी उमाजी यांना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली . उमाजी यांच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक ब्रिटिशांना जाऊन मिळाला. ब्रिटींशानी उमाजी यांची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजी यांची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली.
उमाजी नाईक हे १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना त्यांना पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्यांना पकडणारा ब्रिटिश अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजी यांची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजी नाईक यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारे पहिले नरवीर उमाजी नाईक यांना ३ फेब्रुवारी १८३4 रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४3 व्या वर्षी फासावर चढवले . इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजी यांचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजी यांच्याबरोबर ब्रिटिशांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
अशा या धाडसी उमाजी नाईक यांच्या तब्बल १३ वर्षांनी १८४५ मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.
   दुर्लक्षित क्रांतिकारक उमाजी नाईक


उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. भारतातील ब्रिटिशविरुद्धच्या १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले होते पण त्यांची नोंद इतिहासकारांनी म्हणावी तशी घेतली नाही . अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा आणि सर्व प्रथम ब्रिटिशांना देशाबाहेर घळवण्यासाचं स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर म्हणजे 'उमाजी नाईक' होतं .
उमाजी नाईक हे रामोशी-बेरड समाजाशिवाय इतरांनी त्याच्याकडं दुर्लक्षच केल्याचं जाणवत . त्यामुळे, उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहिल्याचं दिसतं .
क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच नागरिकांनी केले पाहिजे , असं आपण म्हणतो पण जातीपाती मानसिकतेमुळंमग उपेक्षित घटकातील हउमाजी नाईक यांच्या सारख्या देशभक्ताची उपेक्षाही करतो असं असही म्हणण्याची वेळ येते . खरं पहिलं तर " मरावे परि क्रांतिरूपे उरावे " ही उक्ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांना तंतोतंत लागू पडते . ते स्वत:च्या कार्या - कर्तृत्ववान ते स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकाराकांसाठी दीपस्तंभ ठरले आहेत .त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट यांनी १८२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे . जनता त्यांना मदत करत आहे . कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार तर करणार नाही ना ?"
तर दुसरा ब्रिटिश अधिकारी टॉस म्हणतात , " उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून ती उमाजी नाईकांच्या कर्तृत्वाची पावती आहे . इंग्रजांनी कपट करस्थांन आखून देश दीर्घकाळ आपल्या ताब्यात कसा राहील याची रणनीती आखली नसती तर कदाचित स्वातंत्र्याचा सूर्य तेव्हाच भारतात उगवला आसता .
आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीच्या कुटुंबियांकडॆ पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती . त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचेपुरे आणि करारी होते . त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली होती . उमाजी जसे जसे मोठे होत गेले तसे त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. याच काळात इंग्रजांनी भारतावर आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी १८१८ मध्ये पुणे ताब्यात घेतले . त्यानंतर ब्रिटिशांनी सर्वप्रथम इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचं काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिलं . त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली . त्यातच इंग्रजांचे जनतेवरील अत्याचार वाढू लागले . त्यामुळं करारी उमाजी नाईक अस्वस्थ होतं होते . छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन स्वराज्याचा पुकार करत देशावरील परकीयांची सत्ता खपवून घेणार नसल्याचं जाहीर केलं . विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाचा भंडारा उधळत इंग्रजांच्या विरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार , अन्याय झाल्यास ते भावासारखे मदतीस धावून जाऊ लागले . त्यामुळं इंग्रजांना राज्य चालवणं कठीण जाऊ लागलं . लोक न्यायासाठी उमाजी नाईक यांनी मदत घेऊ लागले . त्यातचं इंग्रजांविरुद्ध मानस तयार होऊ लागलं इंग्रजांना हे सहन झालं त्यामुळं उमाजी नाईक यांना ब्रिटिशांनी १८१८ मध्ये अटक करून एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. तुरुंगातील शिक्षे दरम्यान त्यांनी लिहिणे - वाचणेअवगत केले . तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते शांत बसले नाहीत .तर त्यांनी पुन्हा इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी नाईक देशासाठी लढत होते त्यामुळं जनताही त्यांना साथ देऊ लागली . परिणामी इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस यांनी सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजी नाईक यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झालं त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . उमाजी नाईक यांनी पाच ब्रिटिश सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली होती असं सांगितलं जातं . त्यामुळं ब्रिटिश चांगलेच धास्तावले होते . उमाजी यांचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ पाच हजार सैनिक होते.
उमाजी नाईक यांनी १८२४ मध्ये भाबुड्री येथील ब्रिटिशांचा खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ रोजी उमाजी नाईक यांनी ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीच्या डोंगर रंगात उठतील आणि तुमचे जगणे मुश्किल करतील . फक्त इशारा देऊन न थांबता त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० रोजी उमाजी नाईक यांनी आपला पाठलाग करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफनीच्या साह्यानं घायाळ करून पिटाळून लावलं होतं . आणि काही सैनिकांचे प्राणही घेतले होते.
उमाजी नाईक यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी ब्रिटिश सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात " लोकांनी ब्रिटिश नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि ब्रिटींशाविरुद्ध अराजकता माजवावी. त्यांचे खजिने लुटावेत. ब्रिटिशांना शेतसारा,पट्टी देऊ नये. ब्रिटिशांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास ते भारत सोडून जातील आणि आपले नवीन सरकार शासन आपण आणू शकू " असे आवाहनही उमाजी नाईक यांनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजा बनले . या सर्व प्रकारामुळे ब्रिटिश गडबडले आणि त्यांनी उमाजी यांना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली . उमाजी यांच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक ब्रिटिशांना जाऊन मिळाला. ब्रिटींशानी उमाजी यांची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजी यांची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली.
उमाजी नाईक हे १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना त्यांना पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्यांना पकडणारा ब्रिटिश अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजी यांची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजी नाईक यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारे पहिले नरवीर उमाजी नाईक यांना ३ फेब्रुवारी १८३4 रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४3 व्या वर्षी फासावर चढवले . इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजी यांचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजी यांच्याबरोबर ब्रिटिशांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
अशा या धाडसी उमाजी नाईक यांच्या तब्बल १३ वर्षांनी १८४५ मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.
   - यशवंत भंडारे, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment

Pages