किनवट : शिधापत्रीका नसलेल्या व अन्नधान्यापासुन वंचित असलेल्या गरीब व गरजू कुटुंबियांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्य वाटप करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
   कोरोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन, संचारबंदी व जमावबंदी लागू असल्याने हातावर पोट असणा-या कष्टकरी मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, शासनाने प्राधान्य कुटुंब व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना कुटुंबातील प्रतीव्यक्ती ५ किलो तांदळाचे मोफत वाटप सुरू केले असले तरी शिधापत्रिका नसलेल्या गरीब मजूर कुंटुंबियांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे. करिता शासन प्रतिनिधी व अन्न पुरवठामंत्री या नात्याने सामाजिक बांधिलकी स्विकारून ग्रामीण भागातील तलाठी व ग्रामसेवक तसेच शहरी भागातील नगर परिषदेकडून सर्वेक्षण करून ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत अशा गरीब कुटुंबियांचे आधार कार्ड ग्राह्य धरून सरसकट कामगारांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचे राज्यातील जिल्हाधिका-यांना आदेशीत करावे, अशी विनंतीही केराम यांनी निवेदनात केली आहे.
 तथापि, कामगारांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याची जबाबदारी तहसील पातळीवरून सुरू करून एकही गरीब कुटुंब अन्नधान्यापासुन वंचित राहू नये यासाठी ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत तसेच ऑनलाईन केसरी (एपीएल) शिधापत्रिका धारकांना अद्यापही अन्नधान्याचे वाटप झाले नाही, अशा वंचित गरीब कुटंबियांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्याचे वाटप करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
Tuesday, 28 April 2020
Home
तालुका
अन्नधान्यापासून वंचित कुटुंबियांना आधार कार्डवर  मोफत अन्नधान्य वाटप करण्याची आमदार भीमराव केराम यांची मागणी
अन्नधान्यापासून वंचित कुटुंबियांना आधार कार्डवर मोफत अन्नधान्य वाटप करण्याची आमदार भीमराव केराम यांची मागणी
Tags
# तालुका
      
Share This 
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment