मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. राज्यात अनलॉक १ ची नियमावली जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे.
राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.
जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे, तिथे त्या पद्धतीने का होईना, पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
उपलब्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र पुढील काळात विभागाची स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही ते म्हणाले. सद्य:स्थितीत गुगल क्लासरूमचा वापर सुरू करण्यास त्यांनी मान्यता दिली.
Sunday, 31 May 2020
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment