दलित पँथर चळवळीचा उदय उत्कर्ष उत्थान अपयश आणि पतन - राजा ढाले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 17 August 2020

दलित पँथर चळवळीचा उदय उत्कर्ष उत्थान अपयश आणि पतन - राजा ढाले


                          

- August 17, 2020
डॉ. आंबेडकरोत्तर पर्वात महाराष्ट्रातील दलित बौद्ध आणि भारतभर विखुरलेला
मागासवर्गिय समाज यांच्या सर्वकष प्रश्नासाठी रस्त्यावर येवून लढणारी आणि
आपल्या छातीला माती लावून आपले प्राणही धोक्यात घालणारी अशी कोणती
संघटना व चळवळ या देशात गाजली असेल तर ती संघटना व चळवळ 'दलित
पँथर' ही तरुण युवकांची संघटना व चळवळ होय.
हे सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन दलित पँथर हे महाराष्ट्राची राजधानी
मुंबई येथे उदयाला आले. १९७२ हे वर्ष त्याच्या स्थापनेची सुरुवात. त्यांच्या
नावात असलेले विशिष्ट आकर्षण. या वलय व आकर्षणामुळे व त्याच्या कामगिरीमुळे
एक उत्सुकता व कुतूहलता निर्माण झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या विचारधनावर
आधारित उभ्या झालेल्या ह्या दलित पँथर चळवळीने असे काय केले की, एका
वर्षाच्या आतच महाराष्ट्र व्यापून आपल्या स्थापनेच्या दुसऱ्याच वर्षी ह्या संघटनेने
भारत व्यापला व तिसऱ्याच वर्षी म्हणजे १९७४ पावेतो ही भारताबाहेरही डोकावू
लागली. दलित पँथर हा चर्चेचा विषय झाला.
याचा अर्थ दलित पँथर पूर्वी भारतात असे काय घडले होते? त्यामुळे दलित
पँथरला एवढे उग्र स्वरुप धारण करावे लागले आणि दलित बौद्ध आणि
मागासवर्गियांच्या पाठीशी व्रजासारखे उभे राहावे लागले.
एलिया पेरुमल कमिशन रिपोर्ट १९७१ साली आला. ह्या कमिशन रिपोर्ट
मुळे मुंबईत फुले आंबेडकरी सुशिक्षित तरुणात व विशेषतः दलित साहित्यिकात
भयंकर रोष निर्माण झालेला होता. त्यांनी आपल्या मुठी आवळल्या होत्या. एलिया
पेरुमल चेट्टी कमेटीच्या १९७२ मध्ये आलेल्या अहवालाने १९७० च्या दशकात
देशभर दलितावरील अत्याचाराची लाट कशी उसळली होती हे दाखूवून दिले. या
अहवालातील काही संबंधित तपशील व आकडेवारी पुढील प्रमाणे आहे ती
अशी, “१९४५ ते १९६० पर्यंत मागासवर्गियावर पाच लक्ष अत्याचार. १९६०
ते १९६९ ह्या नऊ वर्षाच्या काळात जातिवैमनस्यातून अकराशे सतरा खून करण्यात
आले. यामध्ये मागासवर्गियांचेच बहुसंख्य बळी. याच काळात एकून ५४० बलात्कार
प्रकरणे मागासवर्गिय स्त्रियांबाबत नोंदविली गेली...

या संदर्भात विस्ताराने माहिती देतांना डॉ. शंकरराव खरात म्हणतात,
.....त्या काळात देशांत खेडोपाडी दलितांच्यावर, अन्याय-अत्याचार होत
होते. ते अधिकच वाढत चालले होते. या अत्याचाराचे स्वरूपही भयंकर स्वरुपाची
असत. 'दलित व्यक्तिना जिवंत जाळणे, दलित कुटुंगियांना घरात कोंडून जाळणं,
दलितांची घरे-वस्त्या पेटवणे, त्यांना मार-पीट करणं, त्यांचेखूणं करणं, दलितांचया
पाणी पिण्याच्या विहिरीत विष्ठा, घाण टाकणे, त्यांच्या जमीन-शेतीतील उभी पिक
दांडगाईने कापून नेणं. त्यांच्यावर सामाजीक बहिष्कार टाकून त्यांच्या दैनंदिन
जीवनाची कोंडी करणं, दलित स्त्रियांचा विनयभंग करणं, त्याची जबरदस्तीनं अब्रू
घेणं, अस्पृश्य म्हणून गुलामगिरीची कामं करण्याबद्दल त्यांच्यावर दंडेलीने रूढी
परंपरेचे दडपण आणून जबरदस्ती करणं हे व अशाच स्वरुपाचे दलितांवर अन्याय
व अत्याचार होत होते."
(दलित पँथरचा उदय : डॉ. शंकरराव खरातः कॉन्टीनेन्टल प्रकाशन. पुणे:
दु.आ. १९८८ : पृष्ठ ४६९ दलित पँथरवर उदय : डॉ. शंकरराव खरातः कॉन्टीनेन्टल
प्रकाशन, पुणे : दु. आ. १९८८ पृष्ठ ४६९) दलित पँथरच्या उदयापूर्वी देशात
उदभवलेली परिस्थिती यासाठी कारणीभूत ठरली असे त्या काळातील अनेक
दलित साहित्यिकांनी हे नमूद केले असले तरी या ओढावलेल्या परिस्थितीतून
देशातील मागासवर्गियांसाठी व दलित, बौद्ध समाज बांधवासाठी ज्यांनी बिजभूत
सारतत्त्व विचार केला त्यात राजा ढाले यांचे नांव प्रामुख्याने घ्यावे लागेल. राजाराम
पिराजी ढाले यांच्या नावातच बंडखोरी होती आणि म्हणून त्यांनी विद्यार्थी दशेतूनच
आपल्या नावातील रामाला हद्यपार केले व ते राजा ढाले म्हणून प्रसिद्ध झाले.
बिजभूत कल्पनाचा विचार करतांना राजा ढाले म्हणतात,
कोणतीही बीजभूत कल्पना ही सार्वजनिकरित्या सर्वांच्या डोक्यात एकदमच
येत नसते. ती कुणातरी एकाच्याच डोक्यात प्रथम यावी लागते. ऋषी, मुनी, श्रमण
..
अशा हजारोंनी यात आपले जीवन घालविले परंतु शांती, स्वातंत्र, बंधुता न्याय.
अहिंसा याचा बिजभूत विचार एकाच गौतम बुद्धाच्या डोक्यात पहिल्यांदा आला.
त्यानंतर तो जनमानसाच्या विस्मृतीत गेल्यानंतर काही काळाच्या खंडानंतर तो
कबीर, क्रांतीबा फुले. डॉ. आंबेडकर ह्या एकेकाच महापुरुषांच्या डोक्यात आला.
दलित पँथर ह्या तरुणांच्या संघटनेच्या उदयाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास
मला काही ठळक बाबी स्पष्ट कराव्या लागतील. कारण माझ्या जीवनातील अत्यंत
महत्वाचा कालावधी या दलित पँथर संघटनेने व्यापला होता किंवा असेही म्हणता
येईल की, दलित पँथर ह्या तरुणांच्या संघटनामुळे माझ्या जीवनाला वेगळीच
कलाटणी मिळाली. दलित पँथरचा कार्यकर्ता तो एक दुसऱ्या दलित पँथर कार्यकर्त्यांचा
मित्र होता. दलित पँथरचे शैकडो कार्यकर्ते माझे मित्र होते. परंतु मी कुणाविरुद्धही
आजपावेतो विरोधात

कधी बोललो नाही व लिहिलेही नाही. याच वर्षी राजा ढाले
यांचे मुंबई येथे दि. १६ जुलै २०१९ रोजी निधन झाले. त्यावेळी मी त्यांच्या प्रेत
यात्रेत उपस्थित होतो. मला मुंबईतील जुनी मित्र मंडळी भेटली व चर्चेत हा उपरोक्त
विषय घेऊन मला लिहिण्याची विनंती केली. त्यामुळे हे लेखन प्रपंच.
मित्रहो, राजा ढाले हे विद्यार्थी दशेतूनच लिहायला लागल्यामुळे पारंपारिक
अनुभवविश्वात रममाण असलेल्या तत्कालीन मराठी प्रस्थापित वाङमय क्षेत्रास राजा
ढाले यांच्या वैचारिक लिखानाने प्रचंड हादरे दिले. त्यामुळे राजा ढाले १९६५ -
६६ च्या दरम्यान ते महाराष्ट्राच्या मराठी साहित्य क्षेत्रात अगदी नावाजलेले होते.
ह्या मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचा एक वेगळाच दरारा निर्माण झाला होता.
सत्यकथेची सत्यकथा लिहून त्यांनी प्रस्थापित लेखक, कवी, साहित्यिक क्षेत्रात
जणू काय भुकंपच घडवून आणला होता.
राजा ढाले यांचे वाचन अगदीच दांडगे. त्यामुळे त्यांना वाङ्मयाची सुक्ष जान
झालेली होती. विषय कोणताही असो त्यांच्या चौफेर अभ्यासामुळे त्याची मांडणी
करण्याची विचाराची शिस्त सुक्ष्म जाण सखोल विश्लेषण सामर्थ्य. काटेकोर
तर्कशक्ती यामुळे काळाने आपल्यापुढे पुढे काय वाटून ठेवलेले आहे याबद्दलचा
दुरदृष्टीकोन समजून घेण्याची क्षमता त्यात विद्यमान असल्यामुळे येणाऱ्या परिस्थितीवर
मात करण्यासाठी त्यांनी प्रथम पुढाकार घेतला. त्यांचा हा विचार अगदी स्तुत्य
होता की, केवळ साहित्य क्षेत्रात आपण अडकून पडलो तर जनतेचे दलितांचे प्रश्न
सुटणार नाही यासाठी साहित्यासोबतच रस्त्यावर येवून लढायला हवे. ह्या बिजभूत
विचार कल्पनेच्या विवंचनेत असतांनाच १९७० साली महाराष्ट्रात दलित साहित्याची
चळवळ मूळ घरु पाहात होती की, आणि ह्या दलित साहित्याचे लेखक साहित्यिक
होते बाबूराव बागूल, केशव मेश्राम, दया पवार, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ
आणि ज. वि. पवार होते.
परंतु यावेळी प्रस्तापित साहित्यातून यांना पाहिजे अशीवागणूक तर प्राप्त
झालीच नाही उलट हे कसले दलित साहित्य ? असे म्हणून यावेळी दलित
साहित्यिकांची खिल्ली उडविण्यात आली. त्यांची टिंगल टवाळी करण्यात आली.
मात्र यावेळी राजा ढाले हे दलित साहित्याच्या पाठिशी सर्वशक्तीने उभे झाले.
राजा ढाले यांनी आपल्या अथक प्रयत्नातून आणि भारतातील दलित
जनतेच्या दृष्टिने १९७० च्या शेवटी एक भयंकर खळबळ माजविणारा ५९ पेजेसचा
त्यात समाविष्ठ होता. हा विद्रोहाचा अंक नामदेव ढसाळ आणि ज.वि. पवार यांनी
काढलेला होता. ह्या लेखाने मराठी प्रस्तापित साहित्याची मंबेरीच उडाली परंतु
दलित साहित्याच्या नावाखाली जनतेला. दलितांना चुकीच्या मार्गाने वळविण्याचा
दिर्घ लेख लिहून काढला. त्याचे नाव दलित साहित्य+टिकोजी हा प्रदिर्घ लेख,
'विद्रोह' अनियतकालीकाचा अंक ११ फेब्रुवारी १९७१ रोजी काढण्यात आला
प्रयत्न करणाऱ्या दलित साहित्यावरही व त्यांच्या प्रमुख साहित्यकारावरही हा
भयंकर हल्ला होता.
म्हणूनच दलित साहित्यिक ज. वि. पवारांना लिहावे लागले की, 'दलित
साहित्याच्या उगमापाशी ढाले नग्या तलवारीसह उभे राहिले नसते तर दलित
साहित्याची भ्रूणहत्याच झाली असती.' ह्या लेखाचे वेगळे वैशिष्ट ही हे होते की,
त्वातील पृष्ठ क्रमांक ५३ वरील ब्लॅक मुस्लीम, ब्लॅक पवार, ब्लॅक पँथर या
संघटनाचा विविध प्रकारे विवेचनात्मक आलेला विचार प्रस्तृत झालेला होता.
आपण लिहिलेल्या विचारांसाठी, आणि त्यात वापरलेल्या शब्दासाठी
जागणारे राजा ढाले यांचे प्रगाढशील व्यक्तिमत्व सतत कार्यान्वीत होते आणि
अशी संधी त्यांना मिळाली.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या अंतर्गत बावडा ह्या गावच्या दलित,
बौद्धावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. हा बहिष्कार जून १९७२ ला
गावातील हिंदूनी घातला व याचा म्होरका होता शिवाजीराव पाटील. शिवाजीराव
पाटलाचे भाऊ बाजीराव पाटील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्य होते.
यासाठी ह्या सामाजिक बहिष्काराची शहानिशा करण्यासाठी सिद्धार्थ विहार
वडाला मुंबई येथील १२ दलित साहित्यिकांनी बावडा प्रकरणी महाराष्ट्र शासनाला
इशारा देणारे पत्र १२ में १९७२ रोजी वर्तमान पत्रातून छापून आले. तसेच वावडा
प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ते बारा दलित साहित्यिक बावडयाल गेले व
१२ जून १९७२ रोजी परत आले ह्यात प्रमुखतहा राजा ढाले होते. मात्र यात
नामदेव ढसाळ, ज. वि. पवार बाबूराव बागूल, दया पवार यापैकी कुणीही नव्हते.
म्हणूनच राज ढाले हे निर्विवाद दलित पँथर संघटनेचे संस्थापक ठरतात. तरिही
दलित पँथरचे संस्थापक म्हणवून घेण्याच्या नादात ज.वि. पवार आणि नामदेव
ढसाळ यांनी सारखा प्रयत्न केला. नामदेव ढसाळ म्हणतात,
“९ जुलै १९७२ रोजी २०४ चनीरोड गिरगाव मुंबई, संयुक्त समाजवादी
पक्षाच्या कार्यालयातून खाली उतरुन मी व माझे कविमित्र ज. वि. पवार या दोघानी
दलित पँथर संघटनेची स्थापना केली."
(आंबेडकरी चळवळी आणि सोशालिस्ट कम्युनिष्ट : नामदेव ढसाळ :
१९८१, मुंबई.)
ज. वि. पवार म्हणतात,
"ज. वि. पवार हा नामदेव ढसाळ यांच्या
घरापासून दोन मिनिटाच्या
अंतरावर राहतो. दोघांची गट्टी १२ मे १९७२ रोजी बाप्टी रोड येथील ज. वि.
पवारांच्या घरातून दोघे बाहेर पडले व गोवालिया टॅकपर्यंत जाईस्तोवर रस्त्यातच
दलित पँथरला जन्म दिला. दलित शब्द मी सुचवला तर नामदेवनं पँथर, असे ज.
वि. सांगतो."
(साप्ताहिक मनोहर :१७ फेब्रुवारी १९७४ : ज. विनीदिली मुलाखत,
मुंबई)
ह्याच 'मनोहर' साप्ताहिकात पुढील मजकूर आला आहे, जसे, “बावडा
येथे दलितांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ युक्रांदच्या सहकार्याने दलित
तरुण तेथे जायचे होते. पण तेथे जाऊन भाषणं ठोकण्यापेक्षा काहीतरी लढाऊ
कराव अस ज.वि. पवार व नामदेवचं म्हणणं. त्यामुळे दोघ बावडयाला गेलेच
नाहीत. ती मंडळी परतल्यावर. त्यांचे अहवाल वगैरे ऐकले व मग या दोघानी पँथर
स्थापली.” राजा ढाले म्हणतात,
“दलित पँथरच्या संस्थापक बनण्याच्या धावपडीत १९७३ नंतर विकृत
स्वरुपात इतिहास लिहून संस्थापक पदाकडे झेप घेणारे ज.वि. पवार १ नोव्हेबर
१९७२ च्या नवाकाळ मध्ये मी चिटणीस नव्हे' असे खुलासा करतांना 'मी एक
सामान्य पँथर आहे, असे का म्हणतात ?” (दलित पँथरची संस्थापना : वस्तुस्थिती
आणि विषर्यास : राजा ढाले : ६ डिसेंबर २००२) या वृतांताचा सरळ अर्थ असा
की, बावड्याला घडलेल्या सामाजिक बहिष्काराची शहानिशा व निषेध करण्याकरिता
गेलेल्या राजा ढाले यांच्या कडून ज. वि. पवार आणि नामदेव ढसाळ यांनी
अहवाल वगैरे ऐकले व त्यानंतर या दोघानी दलित पँथर स्थापली. मात्र यातून हे
आगदी व शतप्रतिशत स्पष्ट होते की राजा ढालेनी लिहिलेला शब्द पाळला व
मित्रासोबत ते बावडयाला गेले. या सर्व दृष्टिकोनातून दलित पँथर ह्या संघटनेचे
संस्थापक राजा ढाले ठरतात. अन्य कुणीही दलित पँथरचा संसथापक ठरु शकत
नाही. ही सत्यता यामुळे ज.वि. पवार आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पँथर
स्थापनेच्या संदर्भात सांगितलेल्या तारखा ९ जुलै १९७२, १९ जून १९७२, १२
में १९७२ आणि १२ जून १९७२ निष्फळ ठरतात. हा मी पणा आणि शेखी
बगारण्याचे धोरण यामुळे अनेकांनी अंगिकारल्याचे दिसते.
"चळवळीत विचार प्रथम स्थानानावर असतो आणि चळवळ दुय्यम
स्थानावर. विचारातून चळवळी जन्म घेतात. परंतु चळवळी या विचारांना जन्म देऊ
शकत नाहीत. ते त्यांचे कार्य नव्हे. त्या विचार
वाहून

नेणाऱ्या वाहकसंस्था
असतात. त्या विचारांच्या निर्मितीशी संबंधित नसतात. विचाराभोवतीचे संरक्षक
आणि वाहक कवच एवढेच त्यांचे स्थान असते.” हे राजा ढाले यांचे म्हणणे
९ जुलै १९७२ हा दिवस दलित पँथच्या इतिहासातील एक अतिशय
महत्वाचा दिवस आहे. कारण ह्या दिवशी दलित पँथरचा पहिला मेळावा घेण्यात
आला. हा मेळावा ९ जुलै १९७२ रोजी मध्यमुंबईतील बापटी रोडवरील सिद्धार्थ
'मुंबईतील तरुणांच्या शौर्याचा आलेख' ह्या पुस्तिकेत 'दलित पँथरचा कार्यक्रम
तात्वीक सत्य स्वरुपाचे न बदलणारे असे तत्व आहे. म्हणूनच असे म्हणता येईल
की,
नगरस्थित समाज कल्याण केन्द्रात घेण्यात आला. ज.वि. पवारानीही १९७३ च्या
ठरविणारा हा पहिला मेळावा' असे लिहिले आहे.
आता ह्या एवढया जबरदस्त आणि दलित पँथरच्या पहिल्याच मेळाव्यात
ज्यात २०० सुशिक्षित तरुण गोळा झाले. त्यांच्या पुढे बोलतांना राजा ढाले हे
म्हणाले, “आपला देश स्वातंत्र्य व्हायला येत्या १५ ऑगष्ट १९७२ रोजी २५ वर्षे
पुर्ण होता हेत तरी मात्र आपणाला या देशात स्वातंत्र अजून पावेतो प्राप्त झालेले
नाही यासाठी दलित पँथरने आपल्या जनतेचे दुःख दारिद्र, आपल्यावर झालेले,
होणारे अन्याय अत्याचार वेशीवर टांगण्याची गरज आहे. १४ ऑगष्ट १९७२ रोजी
रात्री १२ नंतर महाराष्टाची विधानसभा रोषणाईने निरवळणार आहे. थेट त्याच वेळी
विधानसभेवर आपला तरुणांचा मोर्चा नेणे अनिवार्य आहे.' आणि हे सर्व उपस्थित
तरुणाने टाळयाच्या गजरात मान्य केले. कारण ज.वि. पवार हे जर असे म्हणत
असतील की, दलित पँथर ची घोषणा १९ जून १९७२ रोजी केली तरिही हे
आपणास समजून घेण्यासारखे आहे की, ज.वि. पवार आणि नामदेव ढसाळ
यांच्याजवळ ९ जुलै १९७२ पासून १४ आगष्ट १९७२ पावेतो कोणताही कार्यक्रम
नव्हता. ९ जुलै १९७२ च्या मेळाव्यात प्रथमतः राजा ढाले यांनी दलित पँथरला
मोर्ध्याचा कार्यक्रम दिला. आझाद मैदानावरुन जुन्या विद्यानसभेवर मोर्चा नेण्याचे
ठरले. त्यानुसार १४ ऑगष्ट १९७२ रोजीच्या मध्यरात्री विधानसभेवर मोर्चा ही
काढण्यात आला. दलित पँथच्या बॅनर खाली घडून आलेला हा पहिला कार्यक्रम
मोर्चा. ह्या मोर्ध्या पुढे राजा ढाले यांचे झालेले अत्यंत ओजस्वी व विद्वतापूर्वक
तरुणांना आकर्षित करणारे भाषण झाले. आणि दुसऱ्याच दिवशी १५ ऑगष्ट
१९७२ रोजी साधना साप्ताहिकात राजा ढाले यांचा लेख प्रकाशित झाला. ज्या
लेखाने महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांनी मिळून आपल्या शहरात, तालुक्यात आणि
गावोगावी, खेड्यापाड्यात दलित पँथर संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. ह्या
लेखाचे नांव होते, 'काळा स्वातंत्र्य दिन' १५ ऑगष्ट १९७२ आणि नामदेव ढसाळ,

ज. वि. पवार, भाईसंगारे, अविनाश महातेकर, उमाकांत रणधीर, दिवाकर रोजवळ
प्रल्हाद वेंददवणकर, अर्जुन डांगळे, भालचंद्र मुगणेकर, हुसेन दलवाही, भाऊ
साळवे, एम. एस. अंधेरीकर, वसंत धामणकर, दयानंद म्हस्के, मधुकर कांबळे,
सुधाकर गायकवाड, रतनकुमार पाटलीपुत्र, साराभाई वेंजूरकर रामदास आठवले,
अरुण कांबळे रमेश निकाळजे, रमेश इंगळे, केशव मेश्राम आदि तरुणांना मुंबईच्या
दलित साहित्यक्षेत्रातील दलित साहित्यिकारांनाही ह्या लेखाने प्रभावित केले.
आणि म्हणूनच ज. वि. पवार यांना १९७३ साली काढलेल्या मुंबईतील तरुणांच्या
शौर्याचा आलेख ह्या' पुस्तिकेत हे आवर्जुन नमूद करावे लागले की,
“याच दरम्यान राजा ढालेच्या काळा स्वातंत्र्य दिन या साधनेतील लेखाने
विचारवंतांची झोप उडविली होती. वर्तमानपत्राचे रकाने व संपादकीय ह्या एकाच
विषयाने गाजत होते. दलित तरुण व नेते मंडळी उलट सुलट चर्चा करत होती.
अवघे वातावरण दलित पँथर व ढालेमय झाले होते. ढाले यांच्या वरील खटला,
साधनाकारांचे राजीनामे, एस.एम. जोशी यांची प्रतिक्रिया यामुळे ह्या विषयाला एक
आगळे, वेगळे महत्व आले होते."
राजा ढाले याबद्दल त्यांची प्रतिक्रिया संघटनात्मकदृष्टया काय होती हे
त्यांच्याच शब्दात सांगणे म्हणजे त्यावेळीची वस्तुस्थिती विशद करण्यासारखे आहे.
राजा ढाले म्हणतात, या ज. वि. पवारांच्याच उक्तीमुळे उघड झाले आहे की, राजा
ढाले यांच्या ह्या वादग्रस्त लेखामुळेच 'पँथर फोफावण्यास मदत झाली. पँथर
फोफावल्यामुळे मी उजेडात आलेली नाही... 'मुंबईतील तरुणांच्या शौर्याचा आलेख'
या पुस्तिकेत त्याचे प्रत्यंतर आले. या पुसितकेत कित्येक जागी माझे नांव पुसून
टाकण्यात आले. दलित पँथरचा विकृत इतिहास लिहिण्याचा आरंभ इथूनच झाला.
कारण रचलेल्या कटकारस्थानात ज.वि.पवार सुद्धा बळी पडले. दलित पँथरची
भूमिका लिहिणारे नामदेव ढसाळ १९७३ च्या आगष्टपर्यंत नक्षलवादी सुनिल दिघे
यांचे पुर्णतः हस्तक झाले होते. माझी आंबेडकरवादी भूमिका यामुळे मी ही त्यांना
अडचणीचा झालो होतो.''
(राजा ढाले : दलित पँथरची संस्थापना : वस्तुस्थिती आणि विपर्यास : ६
डिसेंबर २००२) आता प्रत्येक प्रमुखाची उणीव काढण्यात अर्थ नाही. परंतु राजा
ढाले नी दलित पँथर संघटनेत सर्वाधिक दौरे केलेले आहेत. आमच्या नागपूरला
माझ्याकडे ते सोबत नामदेव ढसाळ यांना घेऊन दोन तीनदा आले. कस्तुरचंद पार्क,
नागपूर येथील झालेली ३० हजार तरुणांची दलित पँथरची सभा नागपूर विदर्भवासी
कदापि विसरु शकणार नाही. ज.वि. बद्दल असे म्हणता येणार नाही. कारण ते

माझ्या कडे कधीच आले नाहीत. बहुतेक त्यांना रुपया पैशाचे महत्व सर्वाधिक
कळले असावे. म्हणून ते सहसा दलित पँथर संघटनेच्या संघटनात्मक कार्यासाठी
सहसा त्यांनी फारच कमी जागी त्यांना जाण्याच्या योग आला. बँकेची नौकरी
कार्यात पडायचे. शेवट या बँकेच्या टेबलावर दलित पँथरचे कार्य कसे करता येईल
यासाठी त्यांनी ती जीवनाचा आधार मानला आणि म्हणूनच सायंकाळी ७ नंतर या
तरी ते २३, २४ ऑक्टोंबर १९७४ रोजी नागपूर अधिवेशनासाठी आले. पण त्यांना
दलित पँथरचे उपाध्यक्षपद न मिळता मलाच मिळाले. त्यामुळे त्यांचे माझ्यावर
आणि राजावर नाराज होणे सहाजिकच होते. बरे असो.
दलित पँथरच्या इतिहासात राजा ढाले एक वेगळेच रसायन होते. दलित
पँथर संघटनेपूर्वीच ते १९६० पासून येऊ आता, तापसी, विद्रोह, जातक, समदृष्टि
चक्रवर्ती धम्मलिपी, धम्मचक्र, प्राचीन इजिप्तच्या कविता, स्थितीच्या कवीता,
Insight आदी ने भरलेले, कलावंत तावून सुलाखून निघालेले, मराठी साहित्य
समुहाला हादरवून टाकणारे आणि दलित साहित्याची कायमची बैठक दृढ करून
फुले आंबेडकरी विचाराला आपले जीवन वाहणारे ते एक या युगातील क्रांतीकारी
पुरुषच होते आणि याची जाणीव नामदेव ढसाळ, ज. वि. पवार यांनी अगदी
जवळून आलेली होती. यात अतिशयोक्ती कसली? शेवटी कबीर म्हणतातच,
कथणी योथी जगत में, करणी उत्तम सार।
कहे कबीर करणी सबल, उत्तरे मौजल पार।।
करनीबिन कथनी कथै, अज्ञानी दिन रात।
कुकर तो भूकत फिरे, सुनी सुनाई बात।।
राजा ढालेनी आपल्या जीवनात, निशाल, शीलता मुलक, समता मुलक
करणी व कृती केली हे करून त्यानी या जगाचा निरोप घेतला, जगतरुपी भौजल
त्यांनी पार करुन निर्वाण पावले. परंतु त्यांच्या असंख्य अनुयायांना राजा ढाले यानी
दलित बौद्धहितार्थ ज्या सबल आणि मजबूत अशा करण्या, कार्ये केली आहेत ते
मात्र सदैव लक्षात राहतील यात शंकानाही दलित पँथर संघटनेचा त्याचे अपयश व
पतन हा शेवटचा टप्पा राहणारच आहे. मात्र त्यापूर्वी त्या संघटनेचा उत्कर्ष व
उत्यान याचीही आपणास सत्यशोधक अशी चर्चा करावी लागणार आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर राजा ढाले यांनी, ब्राह्मणांनी भारतभराच्या हिंदू
मानसिकतेत गीता या धर्मग्रंथाला पुढे करूनच अश्पृश्याला धुळीस मिळविले. या
आधारावरही भारतातील हिंदू धर्मियाने अश्पृश्य दलितावर अनन्यित अन्याय,
अत्याचार सुरु ठेवले आहेत. सांगून. शिवाजी र्पाकवर जाहीररित्या ७ मार्च १९७३

रोजी गीता दहन केले. यावरुन दलित पँथरचे तरुण आता काहीही करु शकतात,
हा निरोप भारत भर पसरला.
यावेळी ज्यांना अटक करण्यातआली त्यात राजा ढाले. विठ्ठलराव साठे,
धुरंधर मिठवावकर, वसंत कृष्णा काळे, चंद्रकांत पाठले, ज्ञानेश्वर मोकळ, दत्तात्रय
वाघमारे, बबन मालेराव प्रल्हाद शिर्के, हिरामन नगरकर आदि सोबत २६४
तरुणांना अटक करण्यात आली. नौकरी पैशाच्या मुळे काहीनी यात माग घेतला
नसला तरी भारतभर हे गीता दहन प्रकरण भयंकर प्रमाणात गाजले. राजकारणात
विशेष रुची नसलेल्या राजा ढाले यांनी आपल्यार सामाजिक, साहित्यिक आंदोलनाला,
अन्याय अत्याचाराचा निषेध करीत ह्या व्यवस्थेची लवतरे भारताच्या वेशीवर
टांगली. कारण क्रमशः दोरे यामुळे महाराष्ट्र आणि भारतभऱ्याने, त्याच्या व्यवस्थेचे
चित्र तयांना उघड्या डोळयांनी जवळून बघता आले. सरकारनी त्यांच्यावर अनेक
खटले भरले त्यांनी त्याची विशिष्ट काळजी घेतली नाही.
शिवसेना ही मुंबईतील तरुणांची बलाढ्य संघटना परंतु या संघटनेचे आंतरिक
स्वरुप उघड करतांना ज. वि.
म्हणतात,
'शिवसेनेचे १९६६ ते १९७२ या कालखंडातील लढवय्या तरुणांचा शोध
घेतल्यास तो प्रामुख्याने दलित असल्याचेच उमजून येईल. जोशी, कुलकर्णी हे
लढाऊ तरुणांचे कपडे राखणारे होते तर तावडे, गावडे, नलावडे हे बटाटेवडे
विकण्यात मशगुल होते. नेतृत्व उच्चवर्णिय परंतु लढवय्ये मागासवर्गिय असे
शिवसेनेचे चित्र होते."
(ज. वि. पवार : आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ : खंड चौथा : १९७२
ते ७७ : पृष्ठ ९० : डिसेंबर २०१०)
दलित पँथरची १९७२ पासून सुरवात झाली आणि राजा ढालेच्या रस्त्यावरच्या
लढयामुळे शिवसेनेतील मागासवर्गिय तरुणांचा लोंढा दलित पँथरकडे वळला.
रक्ताला बेईमान होऊ नये असा यावेळी तरुणांच्या लक्षात आले असावे.
राजा ढाले चा लढा दिवसेंदिवस सत्यावरची लढाई म्हणून उघड होत होता.
यात त्यांनी लढलेला ५ जोनवारी १९७४ चा लढा अगदी प्रखर होता. “वरळीच्या
आंबेडकर मैदानावरील सभा या सभेतून सुरुवातीला भाषणेबाजी करुन नामदेव
ढसाळ हे अनिल बर्वे बरोबर सभा अर्ध्यावर सोडून कम्युनिष्ट स्टाईलमध्ये सातरस्त्याला
निघून गेले. या सभेचे मुख्य सुत्रधार राजा ढाले असल्यामुळे ते सभा सोडून जाऊ
शकत नव्हते. नंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला एकटया राजा ढाले यांना तोंड
द्यावे लागले. पोलिसांचा सारा रोष राजा ढालेवर होता. बलसारासारख्या मग्रुर
पोलिस अधिकाऱ्याला गचांडी दिली नी म्हणून 'साहाब को मारा' हा सूर लावित

पोलिसांनी सारी शक्ती राजा ढाले नी दयानंद म्हस्के विरुद्ध खर्ची घातली. यामुळे
एकटे राजा ढाले यांचे डोके फूटून ते रक्तबंबाळ झाले सोबतच त्याच्या हाताची
झाले. कारण त्यांना राजा ढालेच्या जीवापेक्षाही आपापल्या नौकरीची नितांत
बोटे पोलिसांनी फॅक्टर केली. वरुन त्याला मुंबईच्या रस्त्यावरून फरफटत नेण्यात
आले. अशा वेळी भाई संगारे, ज. वि. पवार अविनाश महातकर हे सर्व भूमिगत
साराभाई
काळजी वाटली असावी. मात्र त्यांनी राजा ढालेची सुटका व्हावी यासाठी १०
जानेवारी १९७४ रोजी मोर्चा काढण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला.” (राजा
ढाले दलित पँथरची संस्थापन : ६ डिसेंबर २००२ : परिशिष्ट
वेंजूळकर : पृष्ठ ९१) १० जानेवारी १९७४ च्या मोर्त्याची पुर्वतयारी म्हणून ७
जानेवारी १९७४ च्या रात्री सिद्धार्थ विहार वडाला हॉस्टेलच्या गच्चीवर झाली.
त्या बैठकीची सर्व सुत्रे कोणत्याही ऐऱ्या, गैऱ्याला न देता बाळ खैरमोळे नि अनंत
बझाव यांच्याकडे सोपविण्यात आली यावरुन यावेळी दलित पँथर चळवळीचे
स्वरुप कशाप्रकारे झाले होते याचा स्पष्ट आभास झाल्याशिवाय राहत नाही. आणि
म्हणूनच राजा ढाले म्हणतात,
“दलित पँथर मधील फुटीच्या मुळाशी' तू मोठा का मी मोठा' हा वाद
मुळीच नव्हता. तो व्यक्तिमत्वातला संघर्ष नव्हता तर दोन प्रणालीतला,
आयडियालॉजीतला तो संघर्ष होता आणि त्याचेच पर्यवसन पुढे फुटीत झाले.
मार्क्सवादाचे आक्रमण जर दलित पँथर वर झालेच नसते. तर माझ्याविरुद्ध असे
डावपेच लढविले गेलेच नसते!"
नामदेव ढसाळ यांनी स्वनिर्णय घेण्याकरिता एक आत्मघातकी निर्णय घेतला
“नामदेव ढसाळयांनी आपली वेगळीच चूल मांडण्यासाठी दलित पँथरच्या राजा
ढाले व त्यांच्या सहकाऱ्याला दलित पँथर मधून काढून टाकले (नवशक्ती ८/८/
१९७४) व त्यांनी आपली नविन कार्यकारिणी घोषित केली, ती अशी होती.
अध्यक्ष लतीफ खाटीक, चिटणीस-नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, सदस्य
प्रल्हाद चेंदवणकर, उत्तम कांबळे, भाई पटोले व रामदास सोरटे.” (ज.वि. पवार
: आंबेडकरोतर आंबेडकरी चळवळ : खंड चौथा : १९७२ ते १९७७ पृष्ठ २३१)
दलित पँथरचे पाहिले अधिवेशन नागपूर येथे २३, २४ ऑक्टोबर रोजी घेण्यात
आले. ह्या अधिवेशनानिमित्त राजा ढालेनी नामदेव ढसाळांच्या कृत्याविषयी एक
पत्रकही काढले होते. आणि म्हणूनच या अधिवेशनातच राजा ढाले यांनी नामदेव
ढसाळ यांना संघटनेतून काढून टाकले. त्यावेळी रजाा ढाले सोबत ज. वि. पवार
सुद्धा उपस्थित होते. नामदेव ढसाळ ‘इतिहासाची चक्रे उलटी फीरवू नका' असे
लिहून राजा ढालेना गडगंजशिव्या घालतोय त्याचे काय ? दलित पँथरची चळवळ

वर्गयुद्धावर आधारलेली असेल तर ती यशस्वी होईल' असे नामदेव ढसाळ ने
म्हटले त्याचे काय ? ७ फेब्रुवारी १९७४ रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये नामदेव
ढसाळाचा कम्युनिष्ट व्हायची गरज नाही. मी मुळातच कम्युनिष्ट आहे. असे
बोलला त्याचे काय ? वरळीच्या दगलीनंतर ते हाडाचे कम्युनिष्ट झाले त्याचे काय ?
बौद्ध शब्दाला जातीचे टिगळ लावून रक्ताचे नाते ही तोडणाऱ्या नामदेव ढसाळाचे
काय? मग खुशाल जा बाबा खड्यात!
दलित पँथर चळवळीबद्दल मी 'विदर्भातील दलित पँथर चळवळीचा इतिहास'
हा ग्रंथ धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोंबर १९९४ रोजी प्रकाशित केला. मात्र
दलित पँथरचे संस्थापक, अर्ध संस्थापक म्हणवून घेणारे ज. वि. पवार यांनी ७ मार्च
१९७७ रोजी दलित पँथर बर्खास्त केली. त्यानंतर मला फोन वरुन २००८ साली,
'विदर्भातील दलित पँथरचा इतिहास' तसेच भालचंद्र लोखंडे लिखीत, रिपब्लिकन
पक्षाला भ्रष्ट करणारे नालायक पुढारी कोण ? ह्या दोन पुस्तिका व दलित पँथरच्या
संदर्भातील फोटो, निगेटीव्ह त्वरित पाठवून देण्याची विनंती केली.
त्यानुसार मी ह्या
दोन्ही पुस्तिका रजिस्टरड करून जा. वि. पवार यांना मुंबईस त्यांच्या घराच्या
पत्यावर बोरीवलीस पाठविल्या.
त्यानंतर ज. वि. पवाराने 'आंबेडकरोतर आंबेडकरी चळवळ : खंड चौथा
१९७२ ते १९७७' हा ग्रंथ ६ डिसेंबर २०१० रोजी मुंबईत चैत्यभूमीवर प्रकाशित
केला व त्याच वेळी त्यांनी मलाही हा ग्रंथ भेट म्हणून दिला.
हा ग्रंथ त्यांनी दलित पँथरचे भागवत जाधव, रमेश देवरुखकर आणि वसंत
धामणकर यांना समर्पित केला आहे. भागवत जाधव आणि वसंत धामणकर याचा
माझा पूर्व परिचय होता. दलित पँथर मध्ये त्याचा त्याग असिम प्रकारचा होता
आणि यासाठीच मी त्याकाळात लिहित होतो तसाच कवीताही करीत होतो. वसंत
धामणकरांनी १४ एप्रिल १९७४ रोजी लिहून प्रकाशित केलेल्या गेरे रिपब्लिकन
पुढारी बिचारी पददलित जनता आणि दलित पँथर' ह्या पुस्तिकेत मी भागवत जाधव
वर एक ऋद्धाजली कविता लिहिली होती. ह्या पुस्तिकेची प्रस्तावना राजा ढाले
यांनी लिहिली असून ह्या पुस्तिकेचे प्रकाशक रामदास आठवले होते. याचा अर्थ
माझे पुस्तक विदर्भातील दलित पँथर चळवळीचा इतिहास' मी लिहून १९९४ ला
प्रकाशित केला त्याच्या तब्बल १४ वर्षानंतर 'दलित पँथरचा इतिहास' ज. वि.
पवाराने २०१० ला लिहावा व त्यातही ते लिहितात, "दलित पँथरचा इतिहास
लिहिण्याचा अधिकार फक्त तिघांनाच आहे. राजा ढाले, नामदेव ढसाळ व ज.वि.
पवार हे ते तीन लोक. या काळात मी 'दलित पँथर चा संघटक आणि नंतर

आणि
सरचिटणीस झालो. त्यामुळे सर्व पत्रव्यवहार आणि संघटनेची भुमिका/पत्रके
विदर्भातील दलित पँथर चळवळीचा इतिहास (१९९४) हा कुचकामि आहे.
माझ्याच सहीने प्रसिद्ध होत होती."
(ज.वि. पवार : खंड ४ : १९७२ ते १९७७ : अस्मिता कम्युनिकेशन, मुंबई
: ६ डिसेंबर २०१० : पृष्ठ प्रस्थावना)
आता हे ज. वि. नी. स्पष्ट केलेच आहे की, बबन लव्हात्रे यांनी लिहिलेला,
म्हणजे तो कामाची नाही एकंदर ही त्यांच्या अधिकार क्षेत्रातील बाब नाही.
म्हणूनच त्यांनी तब्बल १४ वर्षानंतर लिहिलेल्या आपल्या ग्रंथात स्पष्ट केले आहे
की, दलित पँथरचा इतिहास तेच ज.वि., नामदेव ढसाळ आणि राजा ढालेच लिह
शकतात.
आता ज.वि. पवार यांचा असा आग्रहच असेल की, ते, नामदेव ढसाळ
आणि राजा ढाले हेच दलित पँथरचा सत्य इतिहास लिहू शकतात तर हे ओघानेच
आले की, ज. वि. पवार यांच्या बद्दल नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांनी
दलित पँथर बद्दल ज. वि. चा कोणता इतिहास विशद केला आहे.
नामदेव ढसाळाबद्दल दिवाकर शेजवळ म्हणतात,
“नामदेव ढसाळ हे बरीच वर्षे दैनिक सामना' मध्यं 'सारे काही समष्टीसाठी
हा स्तंभ लिहायचे, मी लोकनायक मध्ये असतांना त्यांचा चौथीमिती' हा स्तंभ शुरू
केला होता. त्यावेळी बॉम्बे हॉस्पीटल मधून बरे होऊन बाहेर पडल्यानंतर ढसाळ
यांनी 'सामना' तील एका लेखात ज. वि. पवार यांच्याविषयी विपरीत लिहिले
होते. ज. वि. नी स्वतःच्या खिशातून छदाम तरी दिला काय ? त्यांनी तर दुसऱ्यांच्या
खिशातील पैसे काढून दिले असे ढसाळ यांनी म्हटले होते.
म्हणजे नामदेव ढसाळ जेव्हा दलित पँथरचा इतिहास लिहित होते त्यावेळी
या मित्राने ज. वि. पवाराने त्यांना कोणतीही आर्थिक मदत केली नव्हती यावरुन
नामदेव ढसाळाने ज. वि. पवारांना छदाम कंजूस ठरविले होते. गाडा भर आपली
पुस्तके लिहून प्रकाशित करणारा ज.वि. हा नामदेवसाठी मात्र कंजूस होता आणि
नामदेव ढसाळने पँथरचा इतिहास लिहूच नये असाही ज. वि. चा प्रयत्न असावा.
आणि मित्राना आर्थिक मदत करेल असे ज. वि. च्या मूळ स्वभावातच
नाही. यामुळे नामदेव ढसाळने त्याचा असा इतिहास विशद केल्याचे लक्षात येते.
आता राजा ढाले हे दलित पँथर संघटनेतील यांचा कोणता इतिहास विशद
करतात, तेही अगदी महत्वाचे ठरते.

राजा ढाले म्हणतात,
"दलित पँथरची भूमिका लिहिणारे नामदेव ढसाळ १९७३ च्या ऑगष्टपर्यंत
नक्षलवादी सुनिल दिघे यांचे पुर्णतः हस्तक झाले होते. माझी आंबेडकरवादी
भूमिका व त्यामुळे मीही त्यांना अडचणीचा झालो होतो. त्यांनी माझ्याविरुद्ध
कटकारस्थान रचून आमच्याच संघटनेत बेदिलीचे षढयंत्र रचले होते. या पदयंत्राला
ज. वि. पवार बळी पडले...
दलित पँथर मधील फुटीच्या मुळाशी 'तू मोठा का मी मोठा' हा वाद मुळात
मुळीच नव्हता. तो व्यक्तिमत्वातला संघर्ष नव्हता तर दोन प्रणालीतला,
आयडियालॉजीतला तो संघर्ष होता आणि त्याचेच पर्यवसन पुढे फुटीत झाले.
मार्क्सवादाचे आक्रमण जर ‘दलित पँथर' वर झालेच नसते. तर माझ्याविरुद्ध असे
डावपेच लढविले गेलेच नसते.!'
(राजा ढालेः दलित पँथरची संस्थापनाः वस्तुस्थिती आणि विपर्यासः कु.
आं वि. प्र.के. पुणे : पृष्ठ ७३, ६ डिसेंबर २००२)
दलित पँथर संघटनेतून कुणी कुणाला बाहेर काढावे व दलित पँथर संघटनेत
फुट पाडावी हे कार्य सुद्धा नामदेव ढसाळानी आपल्या पुढाकाराने केले.
"नामदेव ढसाळ यांनी आपली वेगळी चूल मांडण्यासाठी दलित पँथरच्या
राजा ढाले व त्यांच्या सहकाऱ्यांना दलित पँथरमधून काढून टाकल्याचा निर्णय
घेण्यात आला (नवशक्ती ८-८-७४) ढसाळ यांनी आपली नवी कार्यकारिणी
घोषित केली ती होती, अध्यक्ष लतीफ खाटीक, चिटणीस-नामदेव ढसाळ/
अर्जुन डांगळे, सदस्य प्रल्हाद चेंदवणकर, छत्रवंत, उत्तम कांबळे, भाई पटोले व
रामदास सोरटे आदि."
(ज.वि. पवार : आंबेडकरोतर आंबेडकरी चळवळ : खंड चौथा : १९७२
ते १९७७ : ६ डिसें. २०१० : पृष्ठ २३१)
ज. वि. पवार यांचेही नांव नामदेव ढसाळांच्या दलित पँथर कार्यकारिणीत
नव्हते. याचा अर्थ नामदेव ढसाळने दलित पँथर ह्या संघटनेतून राजा ढाले सोबत
ज. वि. पवार यांनाही ८ ऑगष्ट १९७४ रोजी काढून टाकले.
आणि मग राजा ढाले यांनी ठरविलेल्या २३, २४ ऑक्टोबर १९७४ च्या
नागपूर दलित पँथरच्या पहिल्या अधिवेशनात ज. वि. पवार यांनी भाग घेतला. याच
अधिवेशनात राजा ढाले आणि ज. वि. पवार यांनी दलित पँथर संघटनेतून नामदेव
ढसाळाना काढून टाकण्यात आले. त्यानंतर अधिवेशनात सायंकाळी जी कार्यकारिणी
तयार झाली. त्यात राजा ढाले अध्यक्ष. त्यांनी महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार

घोषीत केली यात उपाध्यक्ष म्हणून पाच विभागाचे पाच उपाध्यक्ष घेण्यात आले.
जसे, बबन लव्हात्रे (नागपूर) एस.एम. प्रधान (नांदेड) रमेश कांबळे (पुणे) भाई
संगारे (मुंबई) सरचिटणीस अविनाश महातेकर (मुंबई) कोषाध्यक्ष-उमाकांत रणधीर
(मुंबई)
यामध्ये ज.वि. पवारांचे नांव कुठेही नसल्याने ते नाराज व दुःखी होणे
सहाजिकच होते. याशिवाय रामदास आठवले. अरुण कांबळे यांचीही नियुक्ती
होऊ शकली नाही, राजा ढालेनी केली नाही. ज. वि. पवारांनी ६ डिसेंबर २०१०
रोजी आपला चौथा खंड १९७२ ते १९७७ लिहून प्रकाशित केला त्यात त्यांनी
नामदेव ढसाळांच्या १९७२ पासून त्याच्या व्यक्तित्वाच्या संदर्भात बरेच काही या
ग्रंथात नमूद केले आहे. जसे,
ढाले यांच्या बरोबर कधी मी, कधी संगारे, कधी महातेकर तर कधी भास्कर
आंबावडे हे जायचे. जाहीर सभेवरुन आल्यावर नामदेव माझ्याकडे ढाले यांच्या
विरुद्ध तक्रार करायचा. त्याचे म्हणणे राजा मला नौकरासारखे वागवितो. खर्चाला
पैसे देत नाही. मी त्याला समजावित असे की, राजाकडे पैसे असून असे किती
असणार ? जाहीर सभेवाले हारतुऱ्याना हवे तेवढे पैसे खर्च करतात परंतु वक्त्यांना
पुरेसा खर्च देत नाहीत. एखाद्या सभेचे आमंत्रण आले की मी ढसाळ यांना ढाले
यांच्या बरोबर जायला सांगीत असे. जातो पण मला एवढे पैसे दे' असा त्याचा
आग्रह असायचा सुरवातीला त्याची भूक कमी होती तो पर्यंत त्याला खर्चाला
पैसेदेणे परवडत होते. पुढे त्याची भूक वाढली. ती भूक शमविणे मला शक्य झाले
नाही."
(खंड चौथा : पृष्ठ १०६ : ज. वि. पवार)
'दलित पँथर फुटीची पार्श्वभूमी' या सदराखाली ज.वि. पवार म्हणतात,
“मुंबईमधल्या सभांचया हँडबिल्सवर रजा ढाले यांच्या नावासमोर संस्थापक
दलित पँथर असे काही कार्यकर्त्यांनी छापले होते. अशा प्रकारची एकदोन हँडबिल्स
निघाल्यावर नामदेवने माझ्याकड ना पसंती व्यक्त केली नाही. परंतु त्याची पुनरावृत्ती
होऊ लागल्यावर एके दिवशी नामदेव धावत माझ्याकडे आला. त्याला वाटले मीच
पत्रिकेचा नमुना तयार करुन दिला असेल. त्याला मी समजावण्याचा प्रयत्न केला
की आपण दोघे संस्थापक असलो तरी 'साधना' प्रकरणामुळे दलित पँथरला
प्रसिद्धी मिळत आहे ; प्रसिद्धी मिळायला ढाले यांचा लेखच कारणीभूत असेल तर
त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे? ढाले यांच्या मुळेच संघटनेचा वेलविस्तार
होत आहे. ढसाळांच्या या प्रश्नाने मला कळून चुकले की, नामदेवाच्या मनात

..
राजाबद्दल अढी निर्माण झाली आहे. म्हणजे मत्सर हेच या दुहीला प्राथमिक
कारण होते."
(ज. वि. पवार : खंड चौथा : १९७२ ते १९७७ : पृष्ठ २१६)
राजा आणि नामदेव यांच्यामधील दुराव्याचा मी अनुभवलेला एक प्रसंग
शिवडी बी.डीडी. चाळीमध्ये केदु गांगुर्डे यांच्या पुढाकारामुळे एक सभा झाली. या
सभेवर सावट होते ते शिवसेना - पँथर हाणामारीचे ही सभा तप्त वातावरणात
संपली. तरुणांचा उल्हास उफाळून येत होता. या समुदायातून राजा ढाले झिंदाबादच्या
घोषणा निनादत होत्या. नामदेव व माझ्याही नावाने एखाद दुसरी घोषणा व्हायची.
ठाकरे मुर्दाबाद, ढाले झिंदाबाद या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता ढाले यांच्या
नावाने घोषणा होत असतांना नामदेवने माझ्याकडे बघून छदमी हास्य केले. नामदेव
हसला तरी तो अंतर्यामी विव्हळला होता. त्याची जड पावले ही त्याची खूण होती.
पुढे नामदेव दूर गेला नाही परंतु आपल्यापरी कार्यक्रम राबवू लागला. विशेषतः
त्याने पुण्यात ठाण मांडले. एकत्र होतो परंतु एकत्र नसल्यासारखे वागत होता.'
(ज. वि. पवार : चौथा खंड १९७२ ते १९७७ : पृष्ठ २१८)
पुढे ज.वि. म्हणतात,
'नामदेवचे एकून वागणेच विक्षिप्त असायचे. त्याचे वागणे एवढे विचित्र
होते की, मुख्यमंत्र्याला चेंबरमध्ये भेटायला गेल्यावर तो त्या मुख्यमंत्र्याची अवास्तव्य
स्तुती करायचा परंतु कॅबिनच्या बाहेर आल्यावर त्याला अर्वाच्या शिव्या घायचा.
हे त्याचे वागणे राजकीय नेत्याबाबतच नव्हते. तर त्याला नारायण सुर्वे सारखे
कवीही अपवाद नव्हतते. एकदा आम्ही सुर्वे यांना त्यांच्या चिंचपोकळी येथील घरी
भेटायला गेलो. घरी जाईपर्यंत व घरी चर्चा करे पर्यंत नारायण सुर्वेना तो सरसर
करीत होता. खाली आल्यावर मात्र सुर्वे आणि त्याच्या पक्षाला शिव्या देऊ
लागला नामदेवची ही वृत्ती माझ्या चांगलीच परिचयाची होती."
(ज.वि. पवार चौथा खंड : ७२ ते ७७ पृष्ठ २१९)
“सुरुवातीला नामदेवबद्दल आकर्षण होते, परंतु पुढे पुढे त्याच्याबद्दल हळु
आवाजात नापसंती व्यक्त होऊ लागली. एखाद्या विभागात टॅक्सीने जायचे अन्
त्या टॅक्सीचे भाडे एखाद्या कार्यकर्त्याला द्यायला लावायचे असले प्रकार वाढले...
नामदेव इतरावर विश्वास टाकीत नव्हता. त्यामुळे त्याच्यावरही विश्वास
टाकणारेही कमी निघाले. सुरुवातीची क्रेझ राहिली नव्हती. नामदेव पैसे काढण्यात
हुशार होता. या कामी त्याने मंत्र्याना, राजकीय नेत्यांना सोडले नाही, तसेच
लेखकांना ही सोडले नाही. नामदेव पैसा गोळा करुन शकतो. अन आपली मौज
करु शकतो म्हणून त्यांच्या अवती भोवती तरुण गोळा होऊ लागले. नामदेव हा

त्याचा आवडीचा खेळ. मलाही त्याचा अनुभव होता. विद्रोहच्या पहिल्या अंकासाठी
दिलेले पैसे त्याने लांबविले होते. नामदेवच्या जे लोक संपर्कात नव्हते. ते त्याला
आपल्या सहकाऱ्यांना खाऊ पिऊ घालणारा.... मित्रांना, सहकाऱ्यांना भूर्दंड देणे हा
क्रांतीकारक समजत होते. परंतु एकदा संपर्कात आले की मग नामदेवांची साथ
'नको रे बाबा' असे म्हणायचे.
(ज. वि. पवार : चौथा खंड : ७२ ते १९७७ : पृष्ठ २२०)
१४ ऑगष्ट १९७३ च्या मोर्त्यानंतर तर अनेक कम्युनिष्टानी नामदेवला
घेरले. सुनील दिघे यांनी तर त्याला हिरोच केला होता. नामदेव भोवती अनेक
कम्युनिष्ठ पिंगा घालू लागले. अनिल बर्वे, सुधीर बेडेकर, सुभाष सरीण, जयंत
गडकरी, कमलाकर सामंत निलीकर भागवत, हिरामण पगारे, बाळ खैरमोळे,
निशिकांत वाघमारे, सिन्हा ही त्यापैकी काही नावे. त्या सगळ्याचे काम एकच.
नामदेवची डावी विचारसरणी उचलून धरणे, पर्यायाने दलित पँथरमध्ये फूट पाडणे...'
'सत्यकथा' मासिक ही प्रस्तापित साहित्यिकांची मक्तेदारी होती 'सत्यकथा'
मासिकात जे प्रसिद्ध होत होते तेच अक्षर वाङमय असा समज ‘सत्यकथा कंपू चा
होता अव्वल दर्जाचे आहे हे खोडून काढण्यासाठी काही संतप्त तरुणांनी सत्यकथेची
होळी केली होती. राजा ढाले यांचा त्यामध्ये पुढाकार होता या सत्यकथेत लिहिणे
म्हणजेच साहित्यिक होणे हा समज दूर कर असे आम्ही ढसाळांना सांगितले. परंतु
ढसाळ ऐकले नाहीत. ते सत्यकथेत कविता लिह लागले सत्यकथेत त्यांची कविता
प्रसिद्ध झाली की महिनाभर तो अंक आल्या गेल्यांना दाखवित असत.
(ज. वि.पवार : खंड चौथा : १९७२ ते १९७७ : पृष्ठ २२० : २२१) ज.
वि. चा जिवलग मित्र दोघांची गट्टी नामदेव ढसाळ, ज. वि. च्या घराजवळच
राहणारा एक दलित पँथरचा संस्थापक दुसरा अर्धसंस्थापक तो दुसऱ्याच्या बाबतीत
खोटेनाटे कशाला लिहिणार ? तरिही लिहितांना तो आपले अस्तित्व जपायचा मी
आणि नामदेव 'मी आणि नामदेव' आणि मग, 'मी आणि राज ढाले' आणि मग
'मी आणि तो' वगैरे वगैरे. अशा प्रकारच्या ज. वि. पवार यांच्या मी भाषेने
सामुहिक शब्द 'आम्ही' मागे पडला. मी या शब्दाने आपल्याच नांवाचा ऐतिहासिक
टेंभा मिरविणाऱ्या या व्यक्तिला मी म्हणतो, मी लिहितो तेच खरे ही भ्रांती झाली
व ती त्याने सातत्याने जोपासली.
ज. वि. पवार आपल्या खंड चौथा : १९७२ ते १९७७ यामधील गवई बंधू
प्रकरणात अगदी शेवटी लिहितात,
"गवई बंधूना न्याय देण्यासाठी मी आणि ढाले यांनी केलेले प्रयत्न
बबन लव्हात्रे यांच्या गावी नसावेत
म्हणून
या प्रकरणाचे क्रेडिट
ते

स्वतःकडे घेतात. वस्तुस्थिती नाकारतात. इतिहासाबरोबर स्वतःचीही
फसवणूक करतात... एवढी की मी वसंत धामणकरांच्या प्रेत यात्रेच्या
वेळी जेलमध्ये असतांना ज. वि. पवार हे प्रेतयात्रेत अग्रमार्गी होते.
असे लिहितात. असो.
(ज. वि. पवार : आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ : खंड चौथा : १९७२
ते १९७७ पृष्ठ २६८)
हा ग्रंथ वाचल्यावर मला अत्यंत वाईट वाटले. उलट ज. वि. वस्तुस्थिती
नाकारतात. २३, २४ ऑक्टोबर १९७४ रोजी नागपूर येथे झालेल्या पहिल्याच
दलित पँथर च्या अधिवेशनात विदर्भ विभागाचे उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती
करण्यात आली होती. आणि असेच उपाध्यक्ष एस.एम. प्रधान (नांदेड) रमेश
कांबळे (पुणे) भाई संगारे (मुंबई) अविनाश महातेकर (मुंबई) आदिंची नियुक्ती
झालेली होती. ज. वि. पवारांचे नांव यात कुठेही नव्हते. त्यामुळे ज. वि.चे मन
दुखावले असावे. ते बँकेतील कर्मचारी असले तरी मोठ्या पदावरच्या जागी
असल्याशिवाय त्यांना करमत नसे.
धाकली प्रकरण मला कळल्यावर मी घरदार सोडून अकोल्यात ढाण मांडून
बसलो. संपूर्ण जिल्हा पिंजून काढला अकोल्याचे नाना राहाटे, डि. एन. खंडारे
आणि व्ही. डी. अडकणे यांच्या सोबत अकोल्यात जंगी जाहीर सभा घेतल्या
आणि पत्र परिषदेतून धाकली प्रकरण विदर्भाच्या वेशीवर टांगले- व ३० सप्टेंबर
१९७४ रोजी धाकली प्रकरणातील प्रमुख आरोपी शालीग्राम शिंदे, भिमराव कपले,
नामदेव जाधव, तारासिंग वंजारी यांना डी. वाय. एस. पी. खर्चे पोलिस विभागाने
अटक केली. राजा ढाले यांच्या पत्रावरून मी नागपूरला परतलो संपूर्ण प्रकरणाची
मोठी फाईल तयार करुन आणि राजा ढाले यांच्या आदेशावरुनच मी पुनच्छ
अकोला येथे जाऊन १९ जानेवारी १९७५ रोजी प्रकरणाची फाईल अकोला पँथर्स
सोबत गवई बंधू यांना मुंबईत राजा ढाले यांच्याकडे पाठविले. मला देण्यात आली
जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडली.
ज. वि. नी. धाकली प्रकरण बँकेच्या टेबलावर बसून सोडविले नाही तर
मुंबईत पंतप्रधान इंदिरा गांधी समोर गवई बंधूना उभे केल्यावर राजा ढाले सोबत ज.
वि. नी यात भाग घेतला एवढेच बँकेतून केवळ दोन तासाचा झालेला खोळंबा
ज.वि. पवारांनी अशी बेताल व्यक्तव्ये करु नयेत. ज्यामुळे दलित पँथर मुळे
आपले सर्वस्व गमावून बसणाऱ्यांना म्हातारपणी पश्चाताप वाटावा.
"गवई बंधूना न्याय देण्यासाठी मी आणि राजा ढाले यांनी केलेले प्रयत्न
बबन लव्हात्रे यांच्या गावी नसावेत' से ज. वि. लिहितात.

परंतु विदर्भातील उब्दा प्रकरण, देवळीकला बहिष्कार प्रकरण, सालेशहरी
ज. वि. पवारांच्या गावी नसावेत. लव्हात्रे
नी नागपूर ह्या धम्मनगरीत घेतलेली फुले आंबेडकरी साहित्य संमेलने, घेतलेल्या
पवार
भरमसाठ धम्म परिषदा आणि राजा ढालेनि भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या
हस्तेभिलाई येथे १९७५ ला झालेल्या धम्म परिषदेत २५ हजार दलितांना बुद्ध
धम्माची दिक्षा देणे व हा भव्य कार्यक्रम घडवून आणणे हे सर्व ज.वि.पवारांच्या
गांवी नाहीत.
आणि म्हणूनच राजा ढाले सारख्या व्यक्तिला लिहावे लागते, ज.वि.
बद्दल राजा ढाले स्वतःच म्हणतात,
“दलित पँथर संबंधात नेमके याच्या उलट घडलेले आहे. दिशाभूल करणारे
लोकच इथे संस्थापक ठरलेले आहेत,... म्हणूनच या सगळ्या संस्थापनेच्या
प्रक्रियेत खेर काय खोटे कोणते, व वस्तुस्थिती कोणती आणि विषर्यास कोणता हे
नीर-क्षीर न्यायाने सांगणे हे महत्वाचे ठरेल. आणि त्यासाठी ज. वि. पवाराने
आपले मौन सोडून याबाबतीतले सत्य कथतन करणे आज आवश्यक आहे.
अन्यथा खोटा इतिहास लिहिणारा म्हणून त्यांचा दुलौकीक होईल याचा शंका
नको!"
(राजा ढाले : दलित पँथरची संस्थापना : वस्तुस्थिती आणि विपर्यास : ६
डिसे. २००२ पुणे : पृष्ठ १९)
कोणत्याही संघटनेचे अपयश जसे नेत्यावर अवलंबून असते तसेच सामान्य
कार्यकर्त्यांचेही दायित्व यासाठी कधी कधी कारणीभूत होत असते. दलित पँथर
संघटनेतील एकीचा वचक, त्यांनी या नांवावर साठलेले संघटनेचे उत्थान व घडून
आलेला उत्कर्ष याला कुठेतरी मर्यादा घेण्याची सुरुवात १९७४ च्या शेवटी
महिण्यात दलित पँथरला आपले अपयश व बेकीचा सुकसुळाच बघावयास मिळाला.
६ डिसेंबर १९७४ रोजी. दलित पँथरचे जे नेते बेंबीच्या देठापासून ओरडून
दलितांना सांगायचे की, दलित पँथरही ही संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या
तत्वज्ञानावर उभी झाली आहे. त्यात आता मार्क्सवादाने आपले वेगळे अस्तित्व
दाखविले.
नामदेव ढसाळ यांच्या गटातील लतीफ खाटीक, प्रल्हाद चंदवणकर, अर्जुन
डांगळे उत्तम कांबळे यांनी याच दिवशी धरणे घरण्याचा कार्यक्रम
घेतला. तर दुसरी कडे दलित पँथरचा तिसरा मेळावा चैत्यभूमीवर घेण्यात आला
हुतात्मा
चौकात
तयात राजा ढाले, ज. वि. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर, दयानंद म्हस्के,
विठ्ठलराव साठे आदिनी भाग घेतला, हे सर्व मुंबईत घडले. परंतु नागपूरातील
दलित

माझ्या सारख्याला यांच्या असह्य वेदना झाल्या. मी लगेच नामदेव ढसाळांना पत्र
लिहून पाठविले की, “नाम्या, तू यापुढे आता नागपूरला येऊ नकोस अन्यथा तुझा
सुनिल दिघे करायला आम्हाला किंचितही वेळ लागणार नाही. ढसाळचा माझा
जवळचा परिचय मात्र त्याने नंतर नागपूर कडे येण्याचे सोडा, बघितले सुद्धा नाही.
राजा ढाले हे आपल्या शिरस्त्याप्रमाणे धम्मक्रांती दिनी नागपूरला यायचे.
१४ ऑक्टोबर १९७५ रोजी धमचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आखण्यात आला
होता. ह्या एका तिसऱ्या गटाचे सुत्रधार भाई संगारे आणि अविनाश महातेकर यांनी
या कार्यक्रमातून आपला तिसरा गट अस्तित्वात आल्याचेच जाहीर झाले. म्हणजे
राजा ढाले यांचा एक गट, नामदेव ढसाळ आणि अर्जुन डांगळे यांचा दुसरा गट
आणि भाई संगारे व अविनाश महातेकर यांचा तिसरा गट. दलित पँथर ह्या एका
बलशाली संघटनेचे आता आता तीन गट झालेले होते.
रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीवर, खोरिपा, गारिपा, आरिपा आणि कारिपा
या गटावर तोंडसुख घेऊन दलित पँथरच्या तरुणांनी आपले वेगळे वैशिष्ट निर्माण
केले होते. मात्र ह्या तीन वर्षातच त्यांच्यातही तीन गट अस्तित्वात आले होते.
मात्र हे होत असतांना सुद्धा नागपूर येथील अंबाझरी उद्यानाजवळ, डॉ. आंबेडकर
सांस्कृतिक भवन समोर झालेल्या बौद्ध शिखर संमेलनात राजा ढाले आणि माझ्यासोबत
सर्व दलित पँथर्स कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
हे अखिल भारतीय बौद्ध शिखर संमेलन आहे. म्हणून राजा ढाले व मी
आम्ही दोघानी या शिखर संमेलनाचे आयोजक वामनराव गोडबोले यांची बाजाजनगरला
भेट घेऊन सांगितले की, आम्ही सर्व पँथर्स आपल्या सोबत आहोत आपल्या
राजकीय नेतृत्वापासून आपणास भिण्याचे कोणतेही कारण नाही. बौद्ध शिखर
परिषद ६, ७, ८, ९ आणि १० डिसें पवितो शांततेत पार पाडली यात जागतिक
किर्तीच्या नेतयांनी भाग घेतला. राजा ढाले आणि भिलाई चे गोपीचंद राजाराम
म्हैसकर आणि मी यांच्या भिलाई येथे बौद्ध शिखर परिषदेसाठी त्यांनी कार्यक्रम
ठरविला. यासाठी राजा ढाले भदत आनंद कौसल्यायन, भाऊसाहेब वाहणे मी
आणि गोपीचंद म्हैसकर आदि रेल्वेने भिलाई प्लॉट येथे पोहोचलो. या प्रसंगी
डोंगरगड, राजनांदगाव, व द्रुग आणि भिलाई प्लॅट स्टेशनवर आमचे उत्सुकर्त
स्वागत करण्यात आले. मी मध्येप्रदेशातील रायपुर बिलासपूर जबलपूर, येथील सर्व
पँथर्संना भिलाई प्लॉन्ट कार्यक्रमाबद्दल पूर्ववत कळविले होते. अहमदनगर आणि
लखणो पेक्षाही हा धरामदिक्षेचा, शिखर परिषदेचा कार्यक्रम भव्य स्वरुपात यशस्वी
व्हावा अशी तयारी भिलाई प्लाँट येथे करण्यात आली होती.

बी.एस.कठाणे, दुर्गाप्रसाद चोहोटेल जबलपूर, बिलासपुरचे नरेन्द्र रामटेके, भिलाईचे
गोपीचंद म्हैसकर, आनंद कांबळे, राजनांदगावचे कमलकुमार खांडेकर, डोंगरगडचे
आमलाचे वसंतकुमार धुर्वे, प्रमोद मानवटकर मुलताईचे, छिंदवाडा सौंसरचे
सी.एन. डोंगरे द्रुगचे दिवाकर लव्हात्रे, रायपूर चे सी. एच. मंडपे आदि पँथर्स नेत्यांनी
भिलाई प्लाँट बौद्ध शिखर परिषदेसाठी बरेच परिश्रम घेतले. यामुळे भाऊ बाहणे
राजा ढाले व माझ्या भाषणानंतर भदनत आनन्द कौसल्यायन यांनी उपस्थित
दलितांना मार्गदर्शन केल्यानंतर २५ हजार उपस्थितांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.
हा ऐतिहासिक क्षण सहसा कदापि कुणी विसरु शकणार नाही. दुसऱ्या दिवशी
आम्ही सर्व नागपूरकडे परतलो. गाडीतच मी राजा ढाले यांना मुंबईच्या सर्व पँथर
गटबाजीविषयी त्यांच्याकडे चिंता व्यक्त केली. यावर ते म्हणाले, “आपल्यातील
कार्यकर्ते नेते होण्याच्या नादात स्वार्थाला बाळी पडत आहेत आणि शेवटी आपणा
सारख्यांना हे सर्व सांभाळून घ्यावे तर लागेलच. आता भाईसंगारे आणि अविनाश
महातेकर बद्दल काय बोलावे ते मुंबईतच बसून खेळ खेळताहेत, दुसरे काय!"
१९७६ लागताच निवडणूकीचे वारे वाहू लागले. निवडणूक कोणतीही
असो दलित पँथरचे तरुणांत एक वेगळ्या उत्साहाचे वातावरण संचारायचे. नामदेव
ढसाळ, अर्जुन डांगळे, ह्या पँथरच्या नावाखाली राबत असलेल्या गटाने काँग्रेस
पक्षाचे प्रचारक बनून आपली लहान भूक भाविण्याचा कसोसीने प्रयत्न सुरु केला
आणि दुसऱ्या एका गटाने दलित पँथरच्या नावाखाली भाई-संगारे आणि अविनाश
महातेकर यांनी नविनच पदार्पण केलेल्या जनता पक्षाचे प्रचारक झाले यात त्यांना
याचेही मान राहिले नाही की, यात जनसंघ सारखा आर.एस.एस. प्रणित जातिय
पक्ष सुद्धा समाविष्ट आहे. यात फुले आंबेडकरी विचारधारा जोपासणारा एकही पक्ष
या निवडणूक रिंगणात नव्हता. परंतु अशा प्रसंगी राजा ढाले आणि ज.वि. पवार
यांचे राजगृहाकडे जाणे वाढले होते. आणि भैय्यासाहेब आंबेडकरांनी बौद्धांच्या
सवलतीच्या प्रश्नावर लोकसभा निवडणूकीत उभे झाले आणि दलित पँथरनी त्यांना
आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राजा ढाले भैय्यासाहेब आंबेडकरांच्या
निवडणूकीचे प्रचारप्रमुख झाले तर ज.वि. निवडणूक यंत्रणेचा प्रमुख झाला.
निवडणूक आटोपल्यावर राजा ढाले यांच्या मानसिकतेत दलित पँथर बर्खास्त
करण्याचा विचार डोकावू लागला. त्यांनी ही गोष्ट माझ्या सारख्या कार्यकर्त्यालाही
समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु केवळ मुंबईच्या तरुणांनी केलेल्या गोंदळामुळे
संपूर्ण देशातील तरुणांना दुसरा पर्याय काय देता येईल आणि तोही यशस्वी ठरला
नाही तर पुढचे भवितव्य... राजानी मला थांबवून सांगितले की, एकदा यांचा धंदा
मला कायमचा बंद करावा लागेल कारण या मोजक्या लोकामुळे फुले-आंबेडकरी

चळवळीचे अपरिमित नुकसान होत आहे. आणि मग राजा ढाले नी उमाकांत
रणधीर, ज. वि. पवार, आदि सर्व मिळून बंद खोलित एक विस्तृत निवेदन तयार
केले. बंद खोलित काय चालेले आहे याची जाणीव रामदास आठवले यांना
होतीच तशीची ती अरुण कांबळेलाही झाली. ७ मार्च १९७७ रोजी राजा ढाले
व ज. वि. पवार यांनी दलित पँथर बर्खास्त केली व त्या जागी मास मुव्हमेन्ट या
संघटनेची निर्मिती केली.
८ मार्च १९७७ ला ही बातमी सर्वत्र प्रसारित झाली. मात्र काही
उरल्यासुरल्यानी हीच वेळ साधून 'दलित पँथर' चालूच ठेवू' असे 'संध्याकाळ'च्याच
बातमीत प्रसारित झाले आणि या पत्रकावर उमाकांत रणधिर, अरुण कांबळे,
रामदास आटवले आणि दयानंद म्हस्के यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ह्यातून दलित
पँथरने रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीला एक प्रकारे आव्हाणच केले की, दलित
पँथर सुद्धा आता गटबाजीत कुणाच्याही मागे नाही!

No comments:

Post a Comment

Pages