माळेगाव (यात्रा) ता.लोहा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणाऱ्या समाज कंटकाला कठोर शासन करावे या आशयाचे निवेदन मा.तहसीलदार,नायगाव(खै) यांच्या मार्फत जिल्हाधिकारी महोदयांनकडे सादर केले.
सदरील घटना समाजात तेढ निर्माण करणारी व सामाजिक वैमनस्य निर्माण करणारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संबंध भारतीयाची अस्मिता आहेत.सदरील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील दिला.यावेळी पुरोगामी चळवळीतील बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment