किनवट तालुक्यातील जलप्रकल्पांत 22.44 टक्के जलसाठा ; गतवर्षी वार्षिक सरासरीच्या 102.85 टक्के पडला पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 1 May 2021

किनवट तालुक्यातील जलप्रकल्पांत 22.44 टक्के जलसाठा ; गतवर्षी वार्षिक सरासरीच्या 102.85 टक्के पडला पाऊस

 


किनवट, दि.01, : किनवट तालुक्यातील एकूण 21 जलप्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा 22.44 टक्क्यांवर आला असून, महत्वाच्या तीन मध्यम प्रकल्पांत केवळ 22.82 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी शेतकर्‍यांना बरीच ओढाताण करावी लागणार आहे.


    किनवट तालुक्यात नागझरी,लोणी व डोंगरगाव येथील तीन मध्यम प्रकल्प, सिरपूर व मांडवी येथील दोन बृहत लघु तलावाशिवाय इतर 13 लघु तलाव व 3 साठवण तलाव आहेत. तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान  पूर्वी 1 हजार 240 मी.मी. होते. हवामान विभागाने तालुक्यातील बर्‍याच वर्षांच्या वार्षिक पर्जन्यमानाचा अभ्यास करून,  गतवर्षापासून किनवट तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1 हजार 63.09 एवढे निश्चित केलेले आहे. राज्य शासनाच्या ‘महावेध’ या पोर्टलवरील नोंदीनुसार गेल्या जून ते ऑक्टोबर दरम्यान तालुक्यात  पडलेला एकूण पाऊस  सरासरी 1093.40 मि.मी. आहे. जो की वार्षिक पर्जन्यमानाच्या 102.85 टक्के पाऊस झालेला आहे.

   आजमितीस ज्या मध्यम,बृहत व लघू प्रकल्पासह साठवण तलावात प्रत्यक्ष उपयुक्त जलसाठा आहे, त्याची आकडेवारी दशलक्ष घनमिटर मध्ये पुढील प्रमाणे असून, कंसातील आकडे त्याची टक्केवारी दर्शवितात.


नागझरी मध्यम प्रकल्प-1.96(29.84), लोणी मध्यम प्रकल्प-1.49(17.82), डोंगरगाव मध्यम प्रकल्प-1.97 (22.36), सिरपूर बृहत- निरंक (जोत्याखाली), मांडवी बृहत-1.81 (35.23), लघू प्रकल्प : कुपटी -  निरंक (जोत्याखाली), मूळझरा-0.398(21.95), थारा-0.19(22.49), निचपूर-0.45(20.56), जलधारा- 0.86(45.95),सिंदगी-0.13(8.46), हुडी-0.37(23.33), पिंपळगाव(कि.)-0.36(16.71), नंदगाव-  निरंक (जोत्याखाली), अंबाडी-0.010(1.28), दरसांगवी-0.18(6.71), पिंपळगाव(भि.)-0.14(6.25), सावरगाव-0.13(10.20), निराळा सा.त.- 0.94(41.42), सिंदगी सा.त.-1.114(48.14), लक्कडकोट सा.त.-1.279(70.51).

    उपरोक्त प्रकल्पातील  सिरपूर बृहत लघुतलावासह दरसांगवी, सावरगाव, अंबाडी आदी लघुतलावांमध्ये गळती असून, यातील बर्‍याच तलावातील पाणी दरवर्षी उन्हाळ्यापूर्वीच संपते. कुपटी व नंदगाव या लघुतलावातील  गेटमध्ये तांत्रिक दोेष असल्या कारणाने, अनेक वर्षापासून ऐन पावसाळ्यात सुध्दा यात पाणी साठले जात नाही. गळती होणार्‍या तलाव तसेच कॅनालच्या दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांकडून जोरदार मागणी होत असल्याने, शासनातर्फे या सर्व तलावांची दुरूस्ती करण्यासाठी त्यातील तांत्रिक दोषांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. खरीप व रब्बी हंगामातील सिंचनासाठी लघुप्रकल्पातील पाणी वापरल्या जाते तर मध्यम प्रकल्पातील  पाणी खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामातील पिकांसाठी पुरविल्या जाते.  निराळा, लक्कडकोट व सिंदगी येथील साठवण तलावामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होते व त्यातील पाणी जनावरांना पिण्यासाठी व नागरिकांना वापरण्यासाठी राखून ठेवल्या जाते.

No comments:

Post a Comment

Pages