इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी एकत्रित काम करणे काळाची गरज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 April 2022

इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी एकत्रित काम करणे काळाची गरज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नवी दिल्ली, 

27 एप्रिल:

इंडो-पॅसिफिकभूभागातीलराष्ट्रांसमोरील समस्या सारख्या असून त्यासाठी एकत्रित येऊन काम करणे काळाची गरज असल्याचे मत, राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांनी आज येथे मांडले. 

ऑबर्जवर रिसर्च फॉऊंडेशन आणिकेंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनेआयोजित ‘रायसीना डायलॉग 2022’ च्यापरिचर्चा कार्यक्रमात   ‘इंडो-पॅसिफिक श्रेत्रातील मानवी विकास पुनर्स्थापित करणे’ या विषयावर विचार मांडताना राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्रीबोलत होते.या परिसंवादातएफडी, फ्रांसचेआंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स कार्यकारी संचालकफिलीपे ऑरलीयांग,स्पेन च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासंचालकजेवीयर सॅलीडो ऑरटीज.युनायटेड किंगडमच्या कॉमन वेल्थ डेव्लपमेंट कार्यालयाचे संचालकमेलींडा बोहोन्नोन,  केनियातीलयुराय्या ट्रस्टचेकार्यकारी संचालक ऊडूअक अमिमो हे उपस्थित होते. या परिसवांदाचे समन्वयनऑस्ट्रेलिया आणि न्युजींलँडच्या संचार व्यवस्थापक रायली बॅजर्नी यांनी केले.

श्री ठाकरे पुढे म्हणाले, एकूणच इंडो-पॅसिफिक भूभागाकडे पाहतानात्यांच्यात सांस्कृत‍िक साम्य अथवाविरोधाभास दिसतो. तथापि, जागतिक पातळीवरील समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये कुपोषण, मुख स्वास्थ्य,अस्वच्छता, मातृ स्वास्थ्य, सद्यात्यात महामारीच्या आधीचे आणि नंतरचे बदल असे प्रश्न सर्वांना कमी अधिक प्रमाणात सारखेच  भेडसावत आहेत. मात्र, शाश्वत विकासाच्या दिशेन वाटचाल करतानास्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा, ग्रीन स्टील, ग्रीन सिमेंटयामध्ये होणा-या गुंतवणूकीबद्दल विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

विकास महत्वाचाच आहे. विकास होत असताना तोलघु अथवा दिर्घकाळाचाहोत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारे  चिंतन गरजेचे असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. शाश्वत विकास करायाचा असल्यास आज, उद्याचा विचार करून चालणार नाही तर, येणा-या पिढयांसाठी हा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगतआपल्या समोर असणारी वाढती लोकसंख्या, बदलते पर्यावरण, सामाजिक राजकीय बदल अशा समस्या आहेत. यासाठी ऊर्जा सुरक्षा, खाद्यान्न सुरक्षा, आरोग्याची काळजी वर्तमानात या बाबी फार महत्वाच्या असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी मांडले. या समस्या सोडविण्यासाठी विविध वैश्विक मंचांवर चर्चा होणे गरजेची असल्याचे त्यांनी व्यक्तकेले. राज्य म्हणून काही योजनांची अंमलबजावणी करता येऊ शकते, पंरतु देशपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनुमते निर्णय होणे देशाच्या आणि राज्याचा विकासाला पुढे घेऊन जाणारे ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.


सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यातील महानगरांचाविकास होत आहे

राज्यातील महानगरांच्या विकासात सार्वजनिक खाजगी भागीदारी महत्वाची असून या माध्यामातून या शहरांचा विकास होत असल्याचे श्री ठाकरे यांनी या पर‍िसंवादात सांगितले. राज्यातील मुंबई, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, औंरगाबाद ही शहरे झपाटयाने वाढत आहेत. यामध्ये लोकसहभाग‍िता महत्वाची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगाचे लक्ष या शहराकडे असून राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी धोरण बनविण्याची आणि ती राबविण्याची आहे. यासह येथेआर्थिक गुंतवणूक होत असताना येथील सुव्यवस्था राखणे, या शहराचे सौदर्यींकरण करणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

सार्वजन‍िक वित्त आणि खाजगी वित्त वापरण्यासदंर्भातील विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री ठाकरे म्हणाले, कोरोनानंतरच्या काळात आपण जगत आहोत, वर्तमानात सर्वच बाबतीत संतुलन राखणे गरजेचे असून राज्य सरकार म्हणून शासनाचा प्रयत्न आहे.सार्वजनिक वित्त असो वा खाजगी वित्त असो यामध्ये संतुलन ठेवावेच लागेल तेव्हाच शाश्वत विकास साधला जाऊ शकतोअसे श्री ठाकरे म्हणाले.

रायसीना  डायलॉग या कार्यक्रमात खासदार शशी थरूर यांनी  श्री ठाकरे यांची वायुप्रदूषण संकटावर मात कशी करता येऊ शकते, राज्य सरकार यासाठी काय पाऊले उचलली आहेत यावषियावर त्यांच्याशी संवाद साधला. 

हरित वित्तपुरवठा आणि ऊर्जा परिवर्तन क्षेत्रात महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय सहाकार्य वाढविण्यासाठी  श्री ठाकरे आणि जपान बँकेचे गव्हर्नर तदाशी मैदा यांच्याशी आज  चर्चा केली. 

इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी

एकत्रित काम करणे काळाची गरज

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नवी दिल्ली, 27 एप्रिल:इंडो-पॅसिफिकभूभागातीलराष्ट्रांसमोरील समस्या सारख्या असून त्यासाठी एकत्रित येऊन काम करणे काळाची गरज असल्याचे मत, राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे यांनी आज येथे मांडले. 

ऑबर्जवर रिसर्च फॉऊंडेशन आणिकेंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनेआयोजित ‘रायसीना डायलॉग 2022’ च्यापरिचर्चा कार्यक्रमात   ‘इंडो-पॅसिफिक श्रेत्रातील मानवी विकास पुनर्स्थापित करणे’ या विषयावर विचार मांडताना राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्रीबोलत होते.या परिसंवादातएफडी, फ्रांसचेआंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स कार्यकारी संचालकफिलीपे ऑरलीयांग,स्पेन च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासंचालकजेवीयर सॅलीडो ऑरटीज.युनायटेड किंगडमच्या कॉमन वेल्थ डेव्लपमेंट कार्यालयाचे संचालकमेलींडा बोहोन्नोन,  केनियातीलयुराय्या ट्रस्टचेकार्यकारी संचालक ऊडूअक अमिमो हे उपस्थित होते. या परिसवांदाचे समन्वयनऑस्ट्रेलिया आणि न्युजींलँडच्या संचार व्यवस्थापक रायली बॅजर्नी यांनी केले.

श्री ठाकरे पुढे म्हणाले, एकूणच इंडो-पॅसिफिक भूभागाकडे पाहतानात्यांच्यात सांस्कृत‍िक साम्य अथवाविरोधाभास दिसतो. तथापि, जागतिक पातळीवरील समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये कुपोषण, मुख स्वास्थ्य,अस्वच्छता, मातृ स्वास्थ्य, सद्यात्यात महामारीच्या आधीचे आणि नंतरचे बदल असे प्रश्न सर्वांना कमी अधिक प्रमाणात सारखेच  भेडसावत आहेत. मात्र, शाश्वत विकासाच्या दिशेन वाटचाल करतानास्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा, ग्रीन स्टील, ग्रीन सिमेंटयामध्ये होणा-या गुंतवणूकीबद्दल विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

विकास महत्वाचाच आहे. विकास होत असताना तोलघु अथवा दिर्घकाळाचाहोत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारे  चिंतन गरजेचे असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. शाश्वत विकास करायाचा असल्यास आज, उद्याचा विचार करून चालणार नाही तर, येणा-या पिढयांसाठी हा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगतआपल्या समोर असणारी वाढती लोकसंख्या, बदलते पर्यावरण, सामाजिक राजकीय बदल अशा समस्या आहेत. यासाठी ऊर्जा सुरक्षा, खाद्यान्न सुरक्षा, आरोग्याची काळजी वर्तमानात या बाबी फार महत्वाच्या असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी मांडले. या समस्या सोडविण्यासाठी विविध वैश्विक मंचांवर चर्चा होणे गरजेची असल्याचे त्यांनी व्यक्तकेले. राज्य म्हणून काही योजनांची अंमलबजावणी करता येऊ शकते, पंरतु देशपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनुमते निर्णय होणे देशाच्या आणि राज्याचा विकासाला पुढे घेऊन जाणारे ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.


सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यातील महानगरांचाविकास होत आहे

राज्यातील महानगरांच्या विकासात सार्वजनिक खाजगी भागीदारी महत्वाची असून या माध्यामातून या शहरांचा विकास होत असल्याचे श्री ठाकरे यांनी या पर‍िसंवादात सांगितले. राज्यातील मुंबई, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, औंरगाबाद ही शहरे झपाटयाने वाढत आहेत. यामध्ये लोकसहभाग‍िता महत्वाची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगाचे लक्ष या शहराकडे असून राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी धोरण बनविण्याची आणि ती राबविण्याची आहे. यासह येथेआर्थिक गुंतवणूक होत असताना येथील सुव्यवस्था राखणे, या शहराचे सौदर्यींकरण करणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

सार्वजन‍िक वित्त आणि खाजगी वित्त वापरण्यासदंर्भातील विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री ठाकरे म्हणाले, कोरोनानंतरच्या काळात आपण जगत आहोत, वर्तमानात सर्वच बाबतीत संतुलन राखणे गरजेचे असून राज्य सरकार म्हणून शासनाचा प्रयत्न आहे.सार्वजनिक वित्त असो वा खाजगी वित्त असो यामध्ये संतुलन ठेवावेच लागेल तेव्हाच शाश्वत विकास साधला जाऊ शकतोअसे श्री ठाकरे म्हणाले.

रायसीना  डायलॉग या कार्यक्रमात खासदार शशी थरूर यांनी  श्री ठाकरे यांची वायुप्रदूषण संकटावर मात कशी करता येऊ शकते, राज्य सरकार यासाठी काय पाऊले उचलली आहेत यावषियावर त्यांच्याशी संवाद साधला. 

हरित वित्तपुरवठा आणि ऊर्जा परिवर्तन क्षेत्रात महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय सहाकार्य वाढविण्यासाठी  श्री ठाकरे आणि जपान बँकेचे गव्हर्नर तदाशी मैदा यांच्याशी आज  चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Pages