किनवट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने महायुती सरकारने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करा यासाठी "क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्यांचे बैलगाडी जनआंदोलन दि. ११ जून रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वात काढण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि सन्मान योजनेतून १५ हजार रुपये, लाडक्या बहिणींना २१०० रुपये अशा अनेक आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने "क्या हुआ तेरा वादा, राज्य सरकारने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी बैलगाड्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांचे जन आंदोलन दि. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा गोंड राजे मैदान येथून महात्मा फुले चौक, बाबूलाल कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिजामाता चौक मार्गे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे निवेदन मारोती दिवसे पाटील (तालुकाप्रमुख), प्रशांत कोरडे (शहर प्रमुख), किशोर बोलेनवार (शहर संघटक), अतुल दर्शनवार (युवा सेना तालुका प्रमुख )यांनी दि. ९ जून रोजी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांसह, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांना दिले आहे. या जनआंदोलनात शेतकरी बांधव व शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहन्याचे आव्हान उपजिल्हा प्रमुख अनिल रुणवाल यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment