भारत हवा की हिंदू पाकिस्तान ? डॉ मेघा पानसरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 20 February 2020

भारत हवा की हिंदू पाकिस्तान ? डॉ मेघा पानसरे

भारत हवा की हिंदू पाकिस्तान ?
डॉ मेघा पानसरे


१६ फेब्रुवारी, २०१५ या दिवसाची सकाळ आम्हा सर्वांसाठी एक भयंकर हिंसक अनुभव घेऊन आली.
खरंतर दररोज सकाळी सव्वा सातच्या दरम्यान ते आणि मी विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी जात असू. पण तीन दिवस कॉम्रेड पानसरे काहीसे आजारी होते. त्यांना ताप आला होता. त्यामुळे ते घरीच होते.
दररोजचे चालणे न झाल्याने ते उमाताईसोबत घरासमोर काही अंतर पाय मोकळे करण्यासाठी म्हणून बाहेर पडले. परत येताना घरासमोरच मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना गोळ्या घातल्या.
घरासमोर कोणीतरी ओरडल्याचा आवाज झाला. मी आणि माझी मुले धावत बाहेर गेलो. तिथले दृश्य पाहून भयंकर धक्का बसला. रस्त्याकडेला उमाताई खाली आडव्या पडल्या होत्या. कॉम्रेड पानसरे मात्र तोंडातून प्रचंड रक्तस्त्राव होत असूनही मागे हात टेकून बसले होते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते.
आम्ही त्यांना जवळ घेतले. परिस्थिती इतकी भीषण होती की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे अत्यावश्यक होते. मुलांना त्यांना धरून ठेवण्यास सांगून मी धावत घरात गेले. कारची किल्ली आणि मोबाईल घेतला. कार अगदी त्यांच्या जवळ उभी केली. तिघांनी धरून त्यांना कारमध्ये बसवले आणि तिथून जवळच्याच अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.
सुरुवातीस ते डॉक्टरांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नव्हते. पण मग एका क्षणी प्रतिसाद मिळताच डॉक्टरांनी भरभर उपचार सुरू केले. उमाताईंनाही उपचार सुरू झाले. आम्ही बाहेर आलो. कोल्हापूरच्या जिल्हा पोलीसप्रमुखांना फोन करायचा होता. एका पोलीस ठाण्यात फोन करून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना झाल्या घटनेची माहिती दिली. आणि मग आम्हाला रडू कोसळलं.
२० फेब्रुवारीला कॉम्रेड पानसरेंचा दु:खद अंत झाला.
हिंदुत्ववाद्यांशी संघर्ष
ज्या माणसानं संपूर्ण आयुष्य तळागाळातील, गोरगरीब-कष्टकरी लोकांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढण्यात घालवले. समाजाला धर्माची चिकित्सा करण्यास शिकवले. विवेकवाद शिकवला. लोकांच्या जगण्यातील प्रश्नांचे कारण नशीब वा मागच्या जन्मीचे पाप नसून सामाजिक-राजकीय-आर्थिक व्यवस्था आहे, हे त्यांना समजावे म्हणून प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला. त्या ८२ वर्षांच्या वृद्धास गोळ्या घालून संपवले गेले.
कॉम्रेड पानसरेंना कोणीही वैयक्तिक शत्रू नव्हते. वर्गसंघर्ष आणि धर्मांधता, जमातवाद व जातिव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष हा त्यांच्या चळवळीतील कामाचा गाभा होता. सर्व शोषित-वंचितांना समतेचे, सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी सर्व डाव्या संघटना, कामगार, शेतकरी व दलित संघटना आणि अल्पसंख्यांक यांनी एक व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता.
अनेकदा कट्टर हिंदुत्ववाद्यांशी संघर्षाचे प्रसंग आले. परंतु ते आपल्या विचारांवर ठाम राहिले. कधीही दडपणाला बळी पडले नाहीत. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल त्यांच्या दृष्टीने मोठे होते.
त्यांच्यावर हल्ला झाला त्याच्या आदल्याच दिवशी ते एका ग्रंथ महोत्सवात भाषण करण्यास गेले होते. बाहेर आल्यावर त्यांची पत्रकारांनी मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले होते की महात्मा गांधींसारख्या वृद्धाचा गोळ्या घालून खून करतात, यात कसले शौर्य आहे? हा तर भेकडपणा आहे. परंतु त्यांनाही त्याच प्रकारे भेकडपणे मारले गेले.

गेली तीन वर्षे खुनाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यात आम्ही इतके गुंतून गेलो आहोत की कधीकधी हा एक अंतहीन प्रवास वाटू लागतो. अनेक महिने तपासाच्या प्रक्रियेत काही निष्पन्न होत नव्हते.
तेव्हा कॉम्रेड पानसरे यांचे स्नेही अॅड. अभय नेवगी यांच्या सल्यानुसार कुटुंबीयामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि तपासासाठी एक पथक नेमले जावे, अशी आमची मागणी होती.
न्यायालयाच्या सुनावणीच्या अगदी काहीच दिवस आधी शासनाने एक विशेष तपास पथक नेमल्याचे जाहीर केले. परंतु तरीही तपासावर उच्च न्यायालयाच्या देखरेखीची मागणी आम्ही तशीच लावून धरली.
दरम्यान दाभोलकर कुटुंबीयांनी सुद्धा अॅड. नेवगी यांच्यामार्फत तशीच याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. तेव्हापासून आजतागायत साधारण दर महिन्याला उच्च न्यायालय तपास अधिकाऱ्यांकडून गोपनीय तपास प्रगती अहवाल घेते आणि त्यावर भाष्य करते.
उच्च न्यायालयाच्या देखरेखीमुळेच आजवर तपासात काही प्रगती दिसते आहे. परंतु अद्याप गुन्ह्यातील शस्त्र, वाहन हे महत्त्वाचे पुरावे तपासात हाती लागलेले नाहीत.
सनातनच्या साधकाला अटक
३० ऑगस्ट, २०१५ रोजी धारवाडमध्ये प्रा. कलबुर्गींचा खून झाला आणि मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बसव वचनांचे ते मोठे संशोधक होते. त्यावेळी त्यांनाही धार्मिक कट्टरवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या, असे समजले.
काही लेखक-कवींसोबत आम्ही कर्नाटकातील बुद्धीजीवींना आवाहन केले की त्यांनी या खुनाचा निषेध करावा आणि शासनाकड

No comments:

Post a Comment

Pages