...आणि विसरता न येणारी ती रात्र..... अॅड.मिलिंद सर्पे,किनवट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 31 July 2020

...आणि विसरता न येणारी ती रात्र..... अॅड.मिलिंद सर्पे,किनवट



    त्या दिवशी आम्ही दुपारच्या रेल्वेने बोधडी(बु.)येथे "दलित पँथर",च्या बैठकिसाठी गेलो होतो.आम्ही जवळपास २५ ते ३० पॅंथर होतो.ही घटना जुलै १९७७ ची असावी.त्यावेळी तालुका दलित पँथर चे अध्यक्ष दादाराव कयापाक व सरचिटणीस सुरेश गायकवाड हे होते‌.या दोन पॅंथर च्या नेत‌त्वाखाली आम्ही संपूर्ण तालुक्यात फिरत होतो.दिवसभर पॅंथर कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी झाल्या.सायंकाळी आठ-साडे आठच्या सुमारास बैठक झाली.बैठक तासभर चालली.त्या नंतर पिटल भाकरीचे जेवन झाले.यात रात्रीचे ११ वाजले.आता झोपायचे कुठे असा प्रश्न  निर्माण झाला.त्याकाळी आपल्या कार्यकर्त्यांची  झोपडीवजा छोटी घरे.आजच्या काळातील समाज मंदिरात सारखी किंवा विहारासारखी सार्वजनिक ठिकाणही त्या काळी नव्हती.अशा परिस्थितीत आम्ही किनवटला पायी जाण्याचे ठरवून रेल्वे पटरीने निघालो देखिल.बोधडी ते किनवटचे आंतर होते.२० किलोमीटर.हे आंतर रात्रभर  कापून आम्ही सकाळी-सकाळी किनवटला पोंहचलो.परंतु,या रात्रीच्या अंधारात आमच्यावर एक विचित्र बाका प्रसंग ओढावला होता.एका मोठ्या अपघातातून आम्ही सहीसलामत बचावलो होतो आणि विसरता न येणा-या त्या रात्रीचा प्रसंग माझ्या समोर क्रमाक्रमाने सरकु लागला.
     "दलित पँथर", ची स्थापना किनवट मध्ये १९७५ मध्ये प्रा‌.पी.एस.धन्वे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.तत्कालीन बौद्ध वाडा व नंतर सिद्धार्थ नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नियोजित बुद्ध विहाराच्या जागेत पॅंथर ची पहीली बैठक झाली होती.तेंव्हा दादाराव कयापाक, सुरेश गायकवाड,रामराव भरणे,माधव कावळे,यादव नगारे, रघुनाथ कावळे,प्रकाश नगराळे,डी.टी.कदम,मनोहर भरणे व मी स्वत:बैठकीला उपस्थित होतो.पुढे चालून दादाराव कयापाक व सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पॅंथरची तुफान चळवळ सुरु झाली.१९७६-७७ मध्ये सुरेश गायकवाड यांनी किनवटच्या बळीराम पाटील महाविद्यालयात ११वी ला प्रवेश घेतला.आपल्या नेतृत्वगुनांमुळे ते बिनविरोध विद्यार्थी संसदेचे सचिव म्हणून निवडून आले.पुढच्या वर्षि(१९७७-७८) मध्ये ते विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली.सुरेश गायकवाड सोबत महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी हे पॅंथरमध्ये सक्रीय कार्य करत होते.ससाने नावाच्या कार्यकर्त्याचे नाव आजही माझ्या लक्षात आहे.
   विद्यार्थी संसदेची निवडणूक झाल्यानंतर कांहीं दिवसांननीच आम्ही बैठकीसाठी बोधडीला आलो होतो.माझ्या आठवणी प्रमाणे बहुतेक तो जुलै चा महिना असावा.
   बैठक आटोपून व जेवन करून आम्हि किनवटला येण्यासाठी रेल्वे पटरीने पायी निघालो होतो.किनवट ते बोधडी दरम्यान मदनापूरच्या पुढे "काळे पाणी "म्हणून एक नाला आहे.भूता -खेताच्या अनेक कथा या नाल्याला जोडल्या जात होत्या.आम्ही रेल्वे पटरीने गप्पा गोष्टी करत चालत येत असतांना त्या काळे पाणी नाल्याच्या जवळ रेलवे पटरीवर आम्हाला एक सूर्या सारखा लाल गोळा पटरीवर असलेला दिसला.हे द‌ष्य दिसताच आम्ही सर्वजन घाबरलो.पुढे जायाचे की नाही याचा विचार सुरु झाला.परंतु,संख्येने आम्ही २५-३०पॅंथर असल्याने पुढे जाण्याचे ठरविले.आम्ही जसे - जसे पुढे जाऊ लागलो तसा- तसा तो गोळा छोटा होत असल्याचे आम्हाला दिसू लागले.त्या लाल गोळ्या जवळ आल्यावर आम्हाला दिसले की रेल्वे पटरीवर लाल कंदिला सारखा दिवा लावून ठेवण्यात आला होता. सकाळी आम्ही किनवटला आल्यावर आपल्या एका रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कळाले की,त्या ठिकाणी माल गाडिचे डब्बे रेल्व पटरीवरुन घसरले होते.यामुळे मागून या मार्गावरुन येणाऱ्या रेल्वे ला कळावे म्हणून त्या ठिकाणी लाल दिवा लावण्यात आला होता.तसेच दोन पटरीच्या सांधिमध्ये बारुद लावण्यात आले होते ‌.विशेष म्हणजे त्या कर्मचा-याने सांगीतले होते की,तुमच्या पैकी एखाद्याचाही पाय त्या बारुदवर पडला असता तर मोठा अपघात झाला असता.
    या प्रसंगामुळे आजही ती न विसरता येणारी रात्र आठवते व तेवढ्याच ताकदीने व निर्धाराने फुले - आंबेडकरी चळवळीत काम करण्याचि उर्जा मिळत रहाते.

 -   अॅड.मिलिंद सर्पे,   किनवट

No comments:

Post a Comment

Pages