भारतरत्न पुरस्काराची सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 January 2023

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २ जानेवारी १९५४ रोजी झाली. हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. क्रीडा, साहित्य, कला, विज्ञान, सेवा, शांती, उद्योग इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना भारत सरकार तर्फे देण्यात येतो. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. २०१४ मध्ये वरील क्षेत्रा बरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. 

आतापर्यंत ४८ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. पहिला भारतरत्न पुरस्कार डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना २ फेब्रुवारी १९५४ रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.

'भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपी मध्ये ‘भारतरत्न’ कोरलेले असते. मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.


सन्मानित व्यक्तींची यादी :-


०१) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४)

०२) चक्रवर्ती राजगोपालचारी (१९५४)

०३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१९५४)

०४) डॉ. भगवान दास (१९५५)

०५) डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१९५५)

०६) जवाहरलाल नेहरू (१९५५)

०७) गोविंद वल्लभ पंत (१९५७)

०८) धोंडो केशव कर्वे (१९५८)

०९) डॉ. बिधान चंद्र रॉय (१९६१)

१०) पुरूषोत्तम दास टंडन (१९६१)

११) डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२)

१२) डॉ. झाकिर हुसेन (१९६३)

१३) पांडुरंग वामन काणे (१९६३)

१४) लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर-१९६६)

१५) इंदिरा गांधी (१९७१)

१६) वराहगिरी वेंकट गिरी (१९७५)

१७) के. कामराज (मरणोत्तर - १९७६)

१८) मदर तेरेसा (१९८०)

१९) आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर-१९८३)

२०) खान अब्दुल गफार खान (१९८७)

२१) एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर-१९८८)

२२) डॉ.बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर-१९९०)

२३) नेल्सन मंडेला (१९९०)

२४) राजीव गांधी (मरणोत्तर -१९९१)

२५) वल्लभभाई पटेल (मरणोत्तर-१९९१)

२६) मोरारजी देसाई (१९९१)

२७) मौलाना आझाद (मरणोत्तर-१९९२)

२८) जे.आर.डी. टाटा (१९९२)

२९) सत्यजित रे (१९९२)

३०) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७)

३१) गुलझारीलाल नंदा (१९९७)

३२) अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर-१९९७)

३३) एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९९८)

३४) चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९९८)

३५) जयप्रकाश नारायण (मरणोत्तर-१९९९)

३६) रवी शंकर (१९९९)

३७) अमर्त्य सेन (१९९९)

३८) गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर-१९९९)

३९) लता मंगेशकर (२००१)

४०) बिसमिल्ला खान (२००१)

४१) भीमसेन जोशी (२००८)

४२) सी.एन.आर. राव (२०१४)

४३) सचिन तेंडुलकर (२०१४)

४४) अटलबिहारी वाजपेयी (२०१५)

४५) मदनमोहन मालवीय (मरणोत्तर-२०१५)

४६) प्रणव मुखर्जी (२०१९)

४७) भूपेन हजारिका (२०१९)

४८) नानाजी देशमुख (मरणोत्तर-२०१९)

No comments:

Post a Comment

Pages